शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला शिवसेनेचा ‘दे धक्का’

By admin | Updated: July 2, 2015 22:43 IST

केळवली जिल्हा परिषद गटात युतीचे सरवणकर विजयी

राजापूर : मागील दोन निवडणुकातील अपयश धुवून काढत शिवसेनेने केळवली जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत यश मिळवले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लढतीत शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांनी काँग्रेस आघाडीचे दीपक बेंद्रे यांचा ८७० मतांनी पराभव केला. सात वर्षांनंतर केळवली जिल्हा परिषद गटावर पुन्हा भगवा फडकला. राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर हे अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या केळवलीच्या जागेसाठी ३० जूनला मतदान घेण्यात आले. एकूण १० हजार २६४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता राजापूर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. दोन्ही उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते.मतमोजणीअंती पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार दीपक बेंद्रे यांना १३८६, तर शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांना १९१६ मते मिळाली होती. यावेळी सरवणकर ५३० मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत दीपक बेंद्रे यांनी १६ मतांची नाममात्र आघाडी घेतली. या फेरीत बेंद्रे यांना २२१७, तर सरवणकर यांना २२०१ मते मिळाली होती. अखेरच्या ७ मतदान केंद्राचा कौल कोणती दिशा घेतो, त्यावरच विजयाचे गणित ठरणार होते. या फेरीत बेंद्रे यांना ९१८, तर सरवणकर यांना १२७३ मते मिळाली आणि शिवसेनेने केळवलीचा गड काबीज केला. शिवसेना उमेदवार रामचंद्र सरवणकर ८७९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले.या निवडणुकीसाठी एकूण १० हजार २६४ मतदान झाले होते. त्यापैकी बेंद्रे यांना ४ हजार ५२१, तर रामचंद्र सरवणकर यांना ५ हजार ३७ मते पडली. ३५३ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.या विजयानंतर आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, केळवलीचे विभागप्रमुख नरेश दुधवडकर, शहरप्रमुख अनिल कुडाळी, महिला आघाडीप्रमुख योगिता साळवी, नगरपरिषदेचे गटनेते अभय मेळेकर, यांच्यासह सर्वांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)हा विजय शिवसैनिकांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी यांचा असून केळवली जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू.- रामचंद्र सरवणकरनूतन जिल्हा परिषद सदस्यया विजयाने सेना राजापूर तालुक्यात भक्कम असून, दीड वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत असेच घवघवीत यश मिळवण्यासाठी सज्ज रहा.- आमदार राजन साळवीराजापुरात जिल्हा परिषद संख्याबळ वाढून ते पाच एवढे झाले आहे तर मित्रपक्ष भाजपचा एक सदस्य असे मिळून सहावर पोहोचले आहे. युतीने सहाच्या सहा जागा जिंकून काँग्रेस राष्ट्रवादीला भुईसपाट केले आहे. काँग्रेसचे कोदवलीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव यापूर्वीच भाजपात गेले. राष्ट्रवादीचे सदस्य अपात्र ठरल्याने आघाडीची पाटी कोरी राहिली आहे.