शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार

By admin | Updated: May 24, 2017 23:21 IST

मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : राज्यात केव्हाही मुदतपूर्व निवडणूक लागल्यास शिवसेना लढण्यास तयार आहे, असे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे सांगितले. सत्ताधारी पक्षाचे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता असल्याचे विधान केले होते. यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवा नेते विक्रांत सावंत, अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कामगारांचा रखडलेला तीन महिन्यांचा पगार संंबंधित ठेकेदाराने न दिल्यास तो बीएसएनएलने द्यावा. या प्रकरणात नेमका दोषी कोण, याबाबत वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कामगारांचा विचार करता त्यांना पगार मिळावा, यासाठी तो कंपनीने द्यावा, असे राऊत म्हणाले. जिल्ह्यात विकासकामांची खोटी बिले तयार करणे, अधिकाऱ्यांची नको त्या व्यक्तीशी हातमिळवणी असणे हा प्रकार यापुढे शंभर टक्के बंद होणार आहे. तसेच राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या सर्व कामांच्या आराखड्याच्या चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासन आपले नोकर असता कामा नये. शिवाय प्रशासनाची उदासिनता लोकांच्या विकासाच्या आड येत असल्यास त्यावर गदा आणण्याचे काम शिवसेना येत्या काळात करणार आहे. राज्यात मुदतपूर्ण निवडणुका केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केले होते. याबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, असे त्यांना विचारले असता शिवसेना केव्हाही निवडणुका झाल्यास तयार आहे. त्यादृष्टीने आपण तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ दौरा केला आहे. येत्या ३० जूनला एक दिवसाचा कोकण दौरा पक्षप्रमुख करणार असून, शिवसंपर्क अभियानालाही सुरुवात झाली असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. मात्र, निवडणुका स्वबळावर का युती करणार? याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. तर त्यांचे बापही ‘जय महाराष्ट्र’ बोलतील...जय महाराष्ट्र बोलल्यास राजकीय पद रद्द होईल, असे वक्तव्य करणारा रोशन बेग म्हणजे बिनडोक्याचा माणूस आहे. कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर जाणूनबूजून भेदभाव केला जात आहे. याबाबत तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा बेगच काय त्याच्या बापालाही जय महाराष्ट्र म्हणावयास लावू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.