शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार

By admin | Updated: May 24, 2017 23:21 IST

मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : राज्यात केव्हाही मुदतपूर्व निवडणूक लागल्यास शिवसेना लढण्यास तयार आहे, असे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे सांगितले. सत्ताधारी पक्षाचे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता असल्याचे विधान केले होते. यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवा नेते विक्रांत सावंत, अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कामगारांचा रखडलेला तीन महिन्यांचा पगार संंबंधित ठेकेदाराने न दिल्यास तो बीएसएनएलने द्यावा. या प्रकरणात नेमका दोषी कोण, याबाबत वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कामगारांचा विचार करता त्यांना पगार मिळावा, यासाठी तो कंपनीने द्यावा, असे राऊत म्हणाले. जिल्ह्यात विकासकामांची खोटी बिले तयार करणे, अधिकाऱ्यांची नको त्या व्यक्तीशी हातमिळवणी असणे हा प्रकार यापुढे शंभर टक्के बंद होणार आहे. तसेच राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या सर्व कामांच्या आराखड्याच्या चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासन आपले नोकर असता कामा नये. शिवाय प्रशासनाची उदासिनता लोकांच्या विकासाच्या आड येत असल्यास त्यावर गदा आणण्याचे काम शिवसेना येत्या काळात करणार आहे. राज्यात मुदतपूर्ण निवडणुका केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केले होते. याबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, असे त्यांना विचारले असता शिवसेना केव्हाही निवडणुका झाल्यास तयार आहे. त्यादृष्टीने आपण तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ दौरा केला आहे. येत्या ३० जूनला एक दिवसाचा कोकण दौरा पक्षप्रमुख करणार असून, शिवसंपर्क अभियानालाही सुरुवात झाली असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. मात्र, निवडणुका स्वबळावर का युती करणार? याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. तर त्यांचे बापही ‘जय महाराष्ट्र’ बोलतील...जय महाराष्ट्र बोलल्यास राजकीय पद रद्द होईल, असे वक्तव्य करणारा रोशन बेग म्हणजे बिनडोक्याचा माणूस आहे. कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर जाणूनबूजून भेदभाव केला जात आहे. याबाबत तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा बेगच काय त्याच्या बापालाही जय महाराष्ट्र म्हणावयास लावू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.