शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिवसेनेत उफाळला जुना-नवा वाद!

By admin | Updated: April 10, 2015 23:40 IST

ग्रामपंचायतीत बंडखोरी : उमेदवारी न मिळाल्याने धरली भाजपा, राष्ट्रवादीची वाट

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून बहुतांश ग्रामपंचायतींवर गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्यावेळी एक मोठा गट राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत जुन्या-नव्या शिवसैनिकांचा वाद उफाळला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोेरी करून पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची दमछाक झाली आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचा एक गट अचानकपणे सेनेत डेरेदाखल झाला. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या गटात होते. मात्र, या गटाला सेनेत घेण्यास त्यावेळीही शिवसैनिक व काही सेना नेत्यांचा प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे सेनेत गटबाजी होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्याचा प्रत्यय तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी आला आहे. जुन्या गटाचे आजही ग्रामपंचायत निवडणुकीवर वर्चस्व आहे. त्यातही ज्या जुन्या शिवसैनिकांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यांनी थेट बंडखोरी केली आहे. नव्या शिवसैनिकांनीही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत पक्षाला आव्हान दिले आहे. अनेकांनी राष्ट्रवादी व भाजपाच्या झेंड्याखाली आश्रय घेत उमेदवारी दाखल केली आहे.तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधून सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यातील काहीजणांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात सेनेला यश आले असले तरी मोठ्या प्रमाणातील बंडखोरी मोडून काढता आलेली नाही. तसेच राष्ट्रवादी व भाजपाच्या आश्रयाने सेनेच्याविरोधात लढणाऱ्या उमेदवारांमुळे अनेक ग्रामपंचायती पुन्हा राखण्यात सेनेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे, त्यामध्ये मिरजोळे, नाचणे, पाली, कर्ला, कोतवडे, मजगाव, सोमेश्वर, काळबादेवी, बसणी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील मिरजोळे ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून सेनेकडे आहे. मात्र, यावेळी या ग्रामपंचायतीत सेनेपुढे सर्वाधिक मोठे बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातून मार्ग काढताना नेते हैराण झाले आहेत. तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेतील बंडखोरी टिपेला पोहोचली असून तीन जागांसाठी शिवसेनेच्या ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही बंडखोरी शमविणार कशी असा प्रश्न सेना नेत्यांसमोर आहे. एकला चलो रे काही जागांचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा उतरली असून ‘एकला चलो रे’मुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला आहे. युती असताना कमी जागांवर तडजोड करावी लागत होती. आता युती नसल्याने जिल्ह्यात भाजपा विरोधात सेना अशी मुख्य लढत होणार आहे. रत्नागिरी तालुक्यात सेनेला बंडखोरीने ग्रासले असून भाजपाचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण होईल.-सचिन वहाळकर, जिल्हाध्यक्ष, भाजपा, रत्नागिरी. धक्का बसण्याची शक्यता गेल्या निवडणुकीत तालुक्यातील ८५ टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले होते. यावेळी जुन्या-नव्या शिवसैनिकांना निवडणुकीत सामावून घेताना सेना नेत्यांची कसरत झाली व बंडखोरीचे ग्रहण लागले. त्यामुळे या निवडणुकीत सेनेच्या ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात भाजपा व राष्ट्रवादीची स्थिती सुधारण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. बंडखोरीचा परिणाम नाही - साळवीतालुक्यात सेनेअंतर्गत काही प्रमाणात बंडखोरी झाली आहे हे मान्य आहे. बंडखोरांची समजूत काढली आहे. या बंडखोरीचा शिवसेनेच्या तालुक्यातील वर्चस्वावर परिणाम होणार नाही. गतवेळेप्रमाणेच यावेळीही शिवसेना ५३ पैकी ४५ ग्रामपंचायतींवर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करील, असा दावा शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.