शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा प्रयोग जनतेला आवडला: शाहाजी पाटील

By अनंत खं.जाधव | Updated: October 15, 2022 19:48 IST

शरद पवार काय, देवाला सोडून मी कोणाला घाबरत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.

सावंतवाडी : 1995 मध्ये तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी सध्या मला महाराष्ट्र भर फिरताना मिळत आहे.ही सर्व देवाची देणगी असून कोकणातील डोंगर ही लय भारी असल्याचे आमदार शाहाजी पाटील म्हणाले. मी कोकणातील गाव आणि गाव फिरलो असल्याने मला कोकण नवा नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही केलेला नवा प्रयोग जनतेला आवडल्याचेही स्पष्ट केले.आमदार पाटील हे कुडाळ येथील कार्यक्रमाला जाताना काही काळ सावंतवाडीत थांबले असता माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी संजू परब,अनारोजीन लोबो,उद्योगपती बापूसाहेब रूपानवर,अजय गोंदावले,राजू बेग अमित परब, दिलीप भालेकर आदि उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण कोकण शी माझे वेगळे नाते आहे. मी 1985 च्या दरम्यान निरिक्षक म्हणून आलो होतो असे ही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकारणात जो बदल झाला तो अपेक्षित होता.काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मंडळी मतदारसंघात काम करायला देत नव्हती.पराभूत उमेदवारास मोठ्याप्रमाणात निधी देत होते अर्थमंत्री अजित पवार हे सर्व घडवून आणत होते.त्याचा प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने शिवसेना अडचणीत होती.त्यामुळेच आम्हाला असा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.पण आता हा निर्णय जनतेने स्वीकारला आहे.असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

मला जी काय झाडी काय डोंगार या वाक्याने प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी यापूर्वी कधी ही मिळाली नव्हती मी 1995 साली तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी जायट किलर ही उपाधी दिली होती तेव्हाही मला जनतेने डोक्यावर घेतले होते पण आता एवढी प्रसिद्धी केव्हाच मिळाली नव्हती असे पाटील यावेळी म्हणाले.

आपण राजकारणात शरद पवार यांना घाबरता का असे विचारता त्यांनी कशाला कोणाला घाबरू असे म्हणत देवाला सोडून मी कोणाला घाबरत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच अंधेरी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे ही यावेळी आमदार पाटील म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी