शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शिमोगाचे वैद्यकीय पथक बांद्यात दाखल

By admin | Updated: March 17, 2017 23:25 IST

माकडताप : गोचिडींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवा

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : बांदावासीय माकडतापाशी सामना करीत आहेत. सद्य:स्थितीत ही साथ पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ, वन, पशुसंवर्धन व आरोग्य खात्याच्या समन्वयातूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरणापेक्षा परिसरात फवारणी करणे, अंगाला आॅईल लावून जंगलात जाणे, मृत माकडाची तत्काळ विल्हेवाट लावणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माकडताप हा संसर्गजन्य रोग नसून, हा रोग केवळ दूषित गोचीड चावल्यानेच होत असल्याने स्थानिकांनी गोचिडींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शिमोगा येथूून आलेल्या विशेष पथकातील डॉ. किरण यांनी केले.बांदा सटमटवाडी परिसरात थैमान घातलेल्या माकडताप आजाराविषयी स्थानिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी शिमोगा येथील विशेष टीम बांद्यात शुक्रवारी सकाळी दाखल झाली. या पथकामध्ये डॉ. किरण यांच्यासह डॉ. संध्या, डॉ. वीरभद्र यांचा समावेश आहे. बांदा सटमटवाडी येथे ग्रामस्थांनाया टीमने मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपवनसंरक्षक रमेश कुमार, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच बाळा आकेरकर तसेच सटमटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांनी योग्य काळजी घ्यावीडॉ. किरण यांनी माकडतापाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हावासीय गेली ५0 वर्षे माकडतापाचा सामना करीत आहेत. ही साथ समूळ नष्ट होत नाही. या आजारावर विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही. माकडांच्या शरीरावर असलेल्या दूषित गोचीड या माणसाच्या शरीराला चावल्यास हा आजार फैलावतो. या तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतच लसीकरण करणे हे योग्य आहे. आताच्या कालावधीत लसीकरण करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. लस घेतल्यानंतरही ताप येणार नाही, याची खात्री नसल्याने स्थानिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.वन, पशुसंवर्धन विभागाला मार्गदर्शनमाकड मृत झाल्यानंतर गोचीड माकडाचे शरीर तत्काळ सोडतात. त्यासाठी मृत माकडाची तातडीने विल्हेवाट लावणे, तसेच मृत माकडाच्या आजूबाजूकडील २० मीटर क्षेत्रात फवारणी करणे या गोष्टी प्राध्यान्याने होणे गरजेचे आहे. अति फवारणी केल्याने माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी ज्या ठिकाणी माकड मृत झाले आहे, त्या ठिकाणीच फवारणी करणे योग्य आहे. यावेळी स्थानिकांच्या विविध शंकांचे निरसन टीमकडून करण्यात आले. वन, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही डॉ. किरण यांनी मार्गदर्शन केले.