शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिमोगाचे वैद्यकीय पथक बांद्यात दाखल

By admin | Updated: March 17, 2017 23:25 IST

माकडताप : गोचिडींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवा

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : बांदावासीय माकडतापाशी सामना करीत आहेत. सद्य:स्थितीत ही साथ पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ, वन, पशुसंवर्धन व आरोग्य खात्याच्या समन्वयातूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरणापेक्षा परिसरात फवारणी करणे, अंगाला आॅईल लावून जंगलात जाणे, मृत माकडाची तत्काळ विल्हेवाट लावणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माकडताप हा संसर्गजन्य रोग नसून, हा रोग केवळ दूषित गोचीड चावल्यानेच होत असल्याने स्थानिकांनी गोचिडींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शिमोगा येथूून आलेल्या विशेष पथकातील डॉ. किरण यांनी केले.बांदा सटमटवाडी परिसरात थैमान घातलेल्या माकडताप आजाराविषयी स्थानिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी शिमोगा येथील विशेष टीम बांद्यात शुक्रवारी सकाळी दाखल झाली. या पथकामध्ये डॉ. किरण यांच्यासह डॉ. संध्या, डॉ. वीरभद्र यांचा समावेश आहे. बांदा सटमटवाडी येथे ग्रामस्थांनाया टीमने मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपवनसंरक्षक रमेश कुमार, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच बाळा आकेरकर तसेच सटमटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांनी योग्य काळजी घ्यावीडॉ. किरण यांनी माकडतापाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हावासीय गेली ५0 वर्षे माकडतापाचा सामना करीत आहेत. ही साथ समूळ नष्ट होत नाही. या आजारावर विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही. माकडांच्या शरीरावर असलेल्या दूषित गोचीड या माणसाच्या शरीराला चावल्यास हा आजार फैलावतो. या तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतच लसीकरण करणे हे योग्य आहे. आताच्या कालावधीत लसीकरण करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. लस घेतल्यानंतरही ताप येणार नाही, याची खात्री नसल्याने स्थानिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.वन, पशुसंवर्धन विभागाला मार्गदर्शनमाकड मृत झाल्यानंतर गोचीड माकडाचे शरीर तत्काळ सोडतात. त्यासाठी मृत माकडाची तातडीने विल्हेवाट लावणे, तसेच मृत माकडाच्या आजूबाजूकडील २० मीटर क्षेत्रात फवारणी करणे या गोष्टी प्राध्यान्याने होणे गरजेचे आहे. अति फवारणी केल्याने माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी ज्या ठिकाणी माकड मृत झाले आहे, त्या ठिकाणीच फवारणी करणे योग्य आहे. यावेळी स्थानिकांच्या विविध शंकांचे निरसन टीमकडून करण्यात आले. वन, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही डॉ. किरण यांनी मार्गदर्शन केले.