शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

शेतमांगराला आग लागून १४ लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 13, 2015 23:37 IST

गाळेल-भोमवाडी येथील घटना : दहा लाखांचा काजू जळून खाक; शॉर्टसर्किटने आग

बांदा : गाळेल-भोमवाडी येथील सुभाष राजाराम परब यांच्या शेतमांगरातील काजू बियांना लागलेल्या भीषण आगीत १0 टन काजू जळून भस्मसात झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे तर मांगराचे चार लाख असे एकूण चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुभाष परब यांची गाळेल येथे मोठी काजू बागायती आहे. याच ठिकाणी बांधलेला शेतमांगर आहे.वर्षभरातील हंगामात गोळा केलेली काजू बी सुभाष परब आपल्या शेतमांगरात साठवून ठेवतात. दिवाळी पाडव्यानंतर ते काजू बी बाजारात विक्रीसाठी नेतात. यावर्षीही परब यांनी काजू बी शेतमांगरात साठवून ठेवली होती. बुधवारी लक्ष्मी पूजनानंतर परब आपल्या घरी गेले होते. गुरुवारी सकाळी परब यांचे कामगार याठिकाणी आले असता त्यांना शेतमांगराला आग लागलेली दिसून आली. मात्र, आग मध्यरात्री लागल्याने शेतमांगरातील काजू बी जळून खाक झाले. मांगराचेही मोठे नुकसान झाले. सकाळपर्यंत आग धगधगतच होती. याची माहिती कामगारांनी स्थानिकांना देताच सकाळी आग विझविण्यात आली. याठिकाणी जवळपास वस्ती नसल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले नाही. मांगरातील १0 टन काजू जळाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतमांगराचे व इतर वस्तूंचे सुमारे चार लाख रुपयांंचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच बांदा सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, डिंगणे सरपंच स्मिता नाईक, काँग्रेसचे माजी उपतालुकाध्यक्ष गुरुनाथ सावंत, शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, तलाठी एन. एस. मयेकर, प्रदीप सावंत, विलास सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. (प्रतिनिधी)