शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतमांगराला आग लागून १४ लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 13, 2015 23:37 IST

गाळेल-भोमवाडी येथील घटना : दहा लाखांचा काजू जळून खाक; शॉर्टसर्किटने आग

बांदा : गाळेल-भोमवाडी येथील सुभाष राजाराम परब यांच्या शेतमांगरातील काजू बियांना लागलेल्या भीषण आगीत १0 टन काजू जळून भस्मसात झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे तर मांगराचे चार लाख असे एकूण चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुभाष परब यांची गाळेल येथे मोठी काजू बागायती आहे. याच ठिकाणी बांधलेला शेतमांगर आहे.वर्षभरातील हंगामात गोळा केलेली काजू बी सुभाष परब आपल्या शेतमांगरात साठवून ठेवतात. दिवाळी पाडव्यानंतर ते काजू बी बाजारात विक्रीसाठी नेतात. यावर्षीही परब यांनी काजू बी शेतमांगरात साठवून ठेवली होती. बुधवारी लक्ष्मी पूजनानंतर परब आपल्या घरी गेले होते. गुरुवारी सकाळी परब यांचे कामगार याठिकाणी आले असता त्यांना शेतमांगराला आग लागलेली दिसून आली. मात्र, आग मध्यरात्री लागल्याने शेतमांगरातील काजू बी जळून खाक झाले. मांगराचेही मोठे नुकसान झाले. सकाळपर्यंत आग धगधगतच होती. याची माहिती कामगारांनी स्थानिकांना देताच सकाळी आग विझविण्यात आली. याठिकाणी जवळपास वस्ती नसल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले नाही. मांगरातील १0 टन काजू जळाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतमांगराचे व इतर वस्तूंचे सुमारे चार लाख रुपयांंचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच बांदा सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, डिंगणे सरपंच स्मिता नाईक, काँग्रेसचे माजी उपतालुकाध्यक्ष गुरुनाथ सावंत, शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, तलाठी एन. एस. मयेकर, प्रदीप सावंत, विलास सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. (प्रतिनिधी)