शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्त्याविना जनतेची परवड सुरूच

By admin | Updated: February 20, 2015 23:12 IST

आचिर्णे धनगरवाडा : निवडणुकांना होते आश्वासनांचे नूतनीकरण

प्रकाश काळे - वैभववाडी दीड-पावणेदोनशे लोकवस्तीच्या आचिर्णे धनगरवाड्यावरील जनतेची रस्त्याविना परवड सुरूच आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीला स्थानिक नेत्यांकडून रस्त्याच्या आश्वासनांचे ‘नूतनीकरण’ केले जाते. परंतु, निवडणुकांनंतर त्याच नेत्यांना नूतनीकरण केलेल्या आश्वासनाचा विसर पडत असल्याने शिक्षण, आरोग्यासह जीवनावश्यक गरजांसाठी तेथील जनतेची पिढ्यान्पिढ्या पायपीट सुरू आहे. आचिर्णेच्या ग्रामपंचायतीपासून ५ किलोमीटर अंतरावर धनगरवाडा ही वस्ती आहे. या अंतरापैकी मोईनवाडी-कासारवाडीपर्यंत बारमाही रस्ता आहे. मात्र, तिथून पुढे ३ किलोमीटरवर धनगर समाजाची वस्ती असून, कासारवाडीपासूनची संपूर्ण पायवाट जंगल भागातील खाचखळग्यातून जाते. सन २००० मध्ये ग्रामपंचायतीच्या दप्तरी २६ नंबरला धनगरवाडा रस्त्याची नोंद होऊन किरकोळ खर्च केला गेला. मात्र, त्यानंतर गेल्या १५ वर्षांत या पायवाटेवर शासनाच्या कोणत्याही योजनेतून छदामही खर्ची पडू शकलेला नाही. आचिर्णे धनगरवाड्यावर नाही म्हणायला चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे पाचवीपासून पुढच्या शिक्षणासाठी चिमुकल्यांना पावसाळ्यात नाले तुडवत झाडाझुडपातून पायपीट करावी लागते. गेल्या १५ वर्षांच्या काळात आचिर्णे गावाला काही दिवसांचे सभापतिपद, त्यानंतर ३ वर्षे उपसभापती आणि सध्या जिल्हा परिषद सदस्य आचिर्णेतील आहेत. परंतु, या पदांचा वापर धनगरवाड्यांवर जाणाऱ्या पायवाटेचे रस्त्यात रूपांतर करण्यासाठी होऊ शकला नाही. याची चीड तेथील रहिवाशांच्या बोलण्यातून जाणवते. रस्त्याअभावी आचिर्णे धनगरवाड्यांवरील जनतेला दगड, धोंडे तुडवून रेशन, दळण, किराणा मालासाठी पायपीट करून गावात यावे लागते. तेथून डोक्यावर ओझे घेऊन वस्तीवर परतताना अक्षरश: नाकीनऊ येतात. तेथील आजारी व्यक्ती, वृद्ध तसेच गर्भवती महिलांना तर आजही डोलीचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आचिर्णेच्या धनगरवाड्यावरील जनतेचे रस्त्याच्या अभावी प्रचंड हाल होत असताना शासन दरबारी मात्र ही वस्ती दुर्लक्षित राहिली आहे.