शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा चौकीदार मजुराच्या हाती

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

तिलारी प्रकल्प : आठ महिने धरण अंधारात, तीन महिन्यांपासून रक्षकच नाही--लोकमत विशेष

अनंत जाधव - सावंतवाडी -देशातील प्रमुख धरण प्रकल्पाच्या सुरक्षेचे आॅडिट होत असतानाच गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पाची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. ना धरणावर वीज, ना सुरक्षारक्षक अशी अवस्था आहे. आॅगस्ट २०१४ पासून धरणावरचा वीज पुरवठा खंडित आहे. तसेच निधीअभावी वीजबिल भरण्यात आले नाही. तीन महिन्यांपूर्वी धरणावरचे वीस सुरक्षारक्षकही कमी केल्याने धरणाची सुरक्षा कार्यालयातील चौकीदार व मजूर करत आहेत.२६/११ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अतिरेक्याचे पुढील टार्गेट हे महाराष्ट्रातील मोठे पाटबंधारे प्रकल्प असल्याचे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील मोठ्या प्रकल्पांना विशेष सुरक्षा पुरवण्याचे ठरवले होते. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेला तिलारी आंतरराज्य प्रकल्पही मोठा आहे. आतापर्यंत गोवा तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध निधीतून या धरणावर १ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. १६ टीएमसीचा हा प्रकल्प आहे. १६ किलोमीटर या धरणाचे क्षेत्र असून या धरणाची साधारणत: रूंदी १ किलोमीटरच्या जवळपास आहे. या प्रकल्पातून गोव्याला ७८ टक्के पाणी पुरवठा होत असून महाराष्ट्राला २२ टक्के पाणी मिळत आहे. या धरणावर सर्वाधिक खर्च गोवा सरकारने केला आहे. मात्र, सध्या प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. तिलारी प्रकल्पाला गेले वर्षभर निधी नाही. त्यातच अंतर्गत खर्च मिळेनासा झाल्याने तिलारी प्रकल्पाला विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत जनित्र खराब होऊन आठ महिने उलटली तरी ती बदलण्यात आली नाहीत. ही जनित्रे बदलण्यात न आल्याने तिलारी धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. साधारणत: नवीन जनित्रे बसवण्यासाठी ११ लाखाचा खर्च अपेक्षित असून कोनाळकट्टा येथील कार्यालयाने हा प्रस्ताव सप्टेंबर २०१४ मध्ये शासनाकडे पाठवून दिला आहे.मात्र, याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही जनित्रे बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे पूर्ण तिलारी धरण अंधारात आहे. तिलारी धरणाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शासनाने धरणावर असलेले २० सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांचे काम तिलारी येथे कार्यरत असलेले चौकीदार व मजूर करीत आहेत. या चौकीदार व मजुरांकडे कार्यालयीन कामकाजाबरोबरच धरणाच्या सुरक्षेचे काम दिले आहे. आघाडी सरकार गेले आणि युती सरकार आले. मात्र, पाटबंधारे प्रकल्पाच्या चौकशीचा ससेमीरा काही संपत नसल्यानेच कोकणातील अनेक प्रकल्पांना निधी मिळणे दुरापास्त बनले आहे.प्रस्ताव पाठविलातिलारी प्रकल्पावरील विद्युत जनित्रे खराब झाली आहेत. त्यामुळे धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याला ११ लाखांचा निधी अपेक्षित असल्याचे शासनाला पत्राने कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आम्हाला निधी प्राप्त झाला नाही. तर शासनानेच धोरणाप्रमाणे सुरक्षा रक्षक कमी केले आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारीच धरणाची देखभाल करीत आहेत.- आर.बी.कुरणे, कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारेकामे थांबविलीगेले वर्षभर तिलारी प्रकल्पाला निधी आला नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आपली कामे थांबवली आहेत. अधिकारी ठेकेदारांना मुदतवाढ देत आहेत. लोकप्रतिनिधींनी कोकणातील पाटबंधारे प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याने आता पूर्ण होऊ घातलेले प्रकल्पही आता मागे पडत चालले आहेत. तिलारी प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठा प्रकल्प आहे. असे असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.