शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा चौकीदार मजुराच्या हाती

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

तिलारी प्रकल्प : आठ महिने धरण अंधारात, तीन महिन्यांपासून रक्षकच नाही--लोकमत विशेष

अनंत जाधव - सावंतवाडी -देशातील प्रमुख धरण प्रकल्पाच्या सुरक्षेचे आॅडिट होत असतानाच गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पाची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. ना धरणावर वीज, ना सुरक्षारक्षक अशी अवस्था आहे. आॅगस्ट २०१४ पासून धरणावरचा वीज पुरवठा खंडित आहे. तसेच निधीअभावी वीजबिल भरण्यात आले नाही. तीन महिन्यांपूर्वी धरणावरचे वीस सुरक्षारक्षकही कमी केल्याने धरणाची सुरक्षा कार्यालयातील चौकीदार व मजूर करत आहेत.२६/११ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अतिरेक्याचे पुढील टार्गेट हे महाराष्ट्रातील मोठे पाटबंधारे प्रकल्प असल्याचे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील मोठ्या प्रकल्पांना विशेष सुरक्षा पुरवण्याचे ठरवले होते. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेला तिलारी आंतरराज्य प्रकल्पही मोठा आहे. आतापर्यंत गोवा तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध निधीतून या धरणावर १ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. १६ टीएमसीचा हा प्रकल्प आहे. १६ किलोमीटर या धरणाचे क्षेत्र असून या धरणाची साधारणत: रूंदी १ किलोमीटरच्या जवळपास आहे. या प्रकल्पातून गोव्याला ७८ टक्के पाणी पुरवठा होत असून महाराष्ट्राला २२ टक्के पाणी मिळत आहे. या धरणावर सर्वाधिक खर्च गोवा सरकारने केला आहे. मात्र, सध्या प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. तिलारी प्रकल्पाला गेले वर्षभर निधी नाही. त्यातच अंतर्गत खर्च मिळेनासा झाल्याने तिलारी प्रकल्पाला विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत जनित्र खराब होऊन आठ महिने उलटली तरी ती बदलण्यात आली नाहीत. ही जनित्रे बदलण्यात न आल्याने तिलारी धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. साधारणत: नवीन जनित्रे बसवण्यासाठी ११ लाखाचा खर्च अपेक्षित असून कोनाळकट्टा येथील कार्यालयाने हा प्रस्ताव सप्टेंबर २०१४ मध्ये शासनाकडे पाठवून दिला आहे.मात्र, याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही जनित्रे बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे पूर्ण तिलारी धरण अंधारात आहे. तिलारी धरणाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शासनाने धरणावर असलेले २० सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांचे काम तिलारी येथे कार्यरत असलेले चौकीदार व मजूर करीत आहेत. या चौकीदार व मजुरांकडे कार्यालयीन कामकाजाबरोबरच धरणाच्या सुरक्षेचे काम दिले आहे. आघाडी सरकार गेले आणि युती सरकार आले. मात्र, पाटबंधारे प्रकल्पाच्या चौकशीचा ससेमीरा काही संपत नसल्यानेच कोकणातील अनेक प्रकल्पांना निधी मिळणे दुरापास्त बनले आहे.प्रस्ताव पाठविलातिलारी प्रकल्पावरील विद्युत जनित्रे खराब झाली आहेत. त्यामुळे धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याला ११ लाखांचा निधी अपेक्षित असल्याचे शासनाला पत्राने कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आम्हाला निधी प्राप्त झाला नाही. तर शासनानेच धोरणाप्रमाणे सुरक्षा रक्षक कमी केले आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारीच धरणाची देखभाल करीत आहेत.- आर.बी.कुरणे, कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारेकामे थांबविलीगेले वर्षभर तिलारी प्रकल्पाला निधी आला नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आपली कामे थांबवली आहेत. अधिकारी ठेकेदारांना मुदतवाढ देत आहेत. लोकप्रतिनिधींनी कोकणातील पाटबंधारे प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याने आता पूर्ण होऊ घातलेले प्रकल्पही आता मागे पडत चालले आहेत. तिलारी प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठा प्रकल्प आहे. असे असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.