शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मार्चमध्ये आंबा पिकाचा हंगाम

By admin | Updated: February 1, 2016 00:34 IST

थंडी वाढल्याने पोषक वातावरण : मोहोरावर औषध फवारणी अंतिम टप्प्यात

विनायक वारंग ल्ल वेंगुर्ले कोकणात सर्वत्र आंब्याच्या झाडांना चांगलाच मोहोर आला असून सध्या आंबा पिकावरील औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने आंंबा पिकाला हे वातावरण पोषक ठरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आंबा पिकाचा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. कोकणचा राजा हापूस अवघ्या काही दिवसात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा पिकावर सुरु केलेली औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात असून त्याला थंडीची चांगली साथ मिळाली तसेच थंडीमध्ये बऱ्यापैकी सातत्य असल्याने सर्वत्र चांगल्याप्रकारे आंबा झाडांना मोेहोर आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आत्ताचे चित्र सध्या तरी चांगले आहे. जानेवारी महिन्यात आंबा शेतकऱ्यांच्या बागेत काही ठिकाणी वाटाण्या एवढ्या फळांची तर काही ठिकाणी सुपारी एवढ्या फळांनी आकार घेतला आहे. आता थंडीचा ओघ कमी होऊन हळुहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होणार आहे. हवामानातील बदल नैसर्गिकरित्या झाल्यास यंदा आंबा पिक चांगले होण्याची शक्यता आहे. साधारणत: मार्च महिन्यात बऱ्यापैकी आंबा हंगामाला सुरुवात होईल असे चित्र आहे. काही बागांमध्ये तुडतुडा या आंबा पिकावरील किडीचा प्रादुर्भाव होत असून त्यासाठी आंबा शेतकरी आणखीन एक किंवा दोन फवारण्या घेतील. असे असले तरी ज्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव नाही अशा बागांमधील औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात आहे. बागायतदारांना दिलासा : भरघोस पिकाची शक्यता ४गेल्यावर्षी अवेळी पडलेला पाऊस तसेच अतिउष्णतेमुळे आंबा मोहराबरोबरच आंबा पिकावरही परिणाम झाला होता. तसेच थंडीचे प्रमाणही तितके चांगले नव्हते. आंबा पिकासाठी पोषक असलेले वातावरण व हवामान चांगले राहिल्यास जास्तीत जास्त आंबा पिक शेतकऱ्याच्या हाती येणार आहे. यामुळे वेंगुर्लेसह जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.