शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

देवबागमध्ये सागरी अतिक्रमणाने थरकाप

By admin | Updated: June 17, 2014 01:17 IST

प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

मालवण : गेले आठ दिवस मालवण किनारपट्टीवर समुद्राला उधाण असून, देवबाग गावाला आजही सागराच्या अजस्र लाटांनी घेरले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या लाटांनी देवबागात प्रवेश केल्याने देवबागवासीयांचा थरकाप उडाला. आज सोमवारच्या सागरी अतिक्रमणात देवबागवासीयांचे माड जमीनदोस्त झाले, तर सागराच्या महाकाय लाटांनी देवबाग भाजीवाडी येथील दगडी बंधारा उद्ध्वस्त करून टाकला. आज दुपारी मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबाग गावाची पाहणी करून सागरी अतिक्रमणग्रस्त देवबागवासीयांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनांचा कोणताही परिणाम देवबागवासीयांवर झाला नाही. आज पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी (पान १ वरून) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास देवबागच्या समुद्रात उधाण निर्माण झाले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या महाकाय लाटांनी तांडवनृत्य केले. देवबाग मधलीवाडी येथे फ्रान्सीस जुनाव सोझ यांच्या मालकीचे माड सागराच्या लाटांनी जमीनदोस्त केले. भाजीवाडीतील जवळपास ५० ते ७५ फूट जमीन सागराने आपल्या पोटात घेतली आहे. भाजीवाडी येथील स्वप्निल साळगांवकर यांच्या हॉटेललाही सागराच्या लाटांनी आजही घेरले होते. भाजीवाडीतील शासनाने घातलेला संरक्षक बंधारा समुद्राने उद्ध्वस्त केला आहे. या लाटांनी बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. देवबाग येथील संतोष नेवाळकर यांच्या घरात लाटांचे पाणी घुसले. स्थलांतराच्या सूचना मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबागची पाहणी केली. य्तहसीलदारांनी पं. समितीचे सदस्य देवानंद चिंदरकर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी देवबागवासीयांना स्थलांतराच्या सूचना केली असता ग्रामस्थ आमचे ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदारांनी स्थलांतरासाठी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांची मने वळविली पाहिजेत, असे सांगून जर उद्या काही विपरित घडले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)