शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे ‘सागर बंगला’ बंद ::

By admin | Updated: May 4, 2016 00:33 IST

पर्यटकांचे आकर्षण : वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करावी

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील बंदरावरील सागर बंगला म्हणजेच शासकीय विश्रामगृह हे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. देशातील प्रतिष्ठित व्यक्ती या बंगल्यावर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या पाणीटंचाई या एका कारणास्तव वेंगुर्लेतील हा बंगला गेल्या महिन्यात पूर्णत: बंद राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करून हा बंगला कायमस्वरूपी सुरू ठेवणे गरजेचे आहे.वेंगुर्ले शहरापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावर हा बंगला उभा आहे. वेंगुर्ले शहरातून गाडी सरळ बंदराच्या दिशेने निघाली की ज्या ठिकाणी गाडी थांबवून पार्किंग करावी लागते, त्या ठिकाणावर उभे राहून वर नजर टाकली की हा सागर बंगला दृष्टीस पडतो. तेथे गेलेल्या प्रत्येकाला तेथे जाण्याची ओढ निर्माण होते. रस्त्यावरून सुरू होणाऱ्या पायऱ्या चढत चढत जेव्हा आपण त्या बंगल्यासमोर पोहोचतो, तेव्हा आपल्याला विशाल समुद्र दृष्टीस पडतो. त्याच्या एका बाजूला पाहिले तर पुन्हा वरवर जाणाऱ्या पायऱ्या दिसून येतात, ती वाट जाते थेट वेंगुर्लेच्या दीपगृहाकडे. आल्या रस्त्याकडे पाठमोरे होऊन जर आपण मागे पाहिले तर सुंदर अशी वेंगुर्लेची खाडी व बंदर जेटी पाहावयास मिळते. त्या बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या मच्छिमारांच्या बोटींचे दर्शनही विलोभनीय असते. उंचावर, एकाच ठिकाणावरून सकाळी सूर्यदर्शन व सायंकाळी सूर्यास्त पाहण्याची संधी याठिकाणी मिळते. मात्र, सध्या उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नगरपरिषदेकडून येणारे दोन दिवसाआड पाणी ठेवून विश्रामगृह चालवणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने एक-दोन दिवसांपासून नव्हे, तर गेल्या महिन्यापासून हे विश्रामगृह म्हणजेच सागर बंगला बंद ठेवला आहे. सागर बंगला शेवटच्या टोकाला असल्याने तिथपर्यंत पाणी सुरळीत होत नाही. सागर बंगल्यावर बुकिंग करून पाहुणे आले तर पाणीप्रश्न निर्माण होईल म्हणून बांधकाम विभागाने हा सागर बंगला सध्या बंद ठेवला आहे. परिणामी, पर्यटकांमधून व वेंगुर्लेवासीयांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून हा सागर बंगला सुरू करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)