शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीलाच पुजलेलेच

By admin | Updated: June 3, 2015 01:25 IST

असंख्य ग्रामस्थ टांगणीला : दऱ्या खोऱ्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावा लागतो मैलोन मैल प्रवास...

देवरूख : चाफवलीजवळील भोयरेवाडी, धनगरवस्तीत गेली कित्येक वर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील महिला-मुलांना एक किलोमीटरची पायपीट करून दऱ्याखोऱ्यांतून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे एवढ्या लांब उन्हातान्हातून गेल्यानंतर तेथे पाणी मिळेल, याची शाश्वती नसल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. येथील पाणीटंचाई तातडीने दूर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.चाफवली भोयरेवाडी हे सुमारे २०० लोकसंख्येची वाडी आहे. येथे २००७मध्ये जलस्वराज योजना चालू केली गेली. मात्र ती कशीतरी काही दिवस चालली. त्यानंतर बंद पडली. सततच्या तक्रारीनंतर येथे टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र तो ५ ते ७ दिवसांतून येतो. ते पाणी लोकांना, जनावरांना पुरत नाही. त्यामुळे लोकांना एक किलोमीटर पायपीट करून दऱ्याखोऱ्यांतून पाणी आणावे लागते. झऱ्यातून बेलट्याने (छोट्याशा प्लॅस्टिकच्या भांड्याने) पाणी भरून महिला, मुले पाणी आणतात. एक हंडा पाणी मिळवण्यास एक तास लागतो. शिवाय येथे मिळेल ते व मिळेल तसले पाणी आणावे लागते. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही वाडीत सतत काविळीची साथ सुरू आहे.येथे पाणी पुरवठा करण्याबाबत आजपर्यंत अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पूर्तता होत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचाच पाऊस पडतो आणि प्रत्यक्ष पावसाळा सुरु झाल्यावर ती सारी आश्वासने पावसाबरोबर धुवून निघतात. अशीच स्थिती या वाडीची झाली आाहे. पाणी हे जीवन आहे पण याच जीवनाला प्राप्त करण्यासाठी या वाडीतील गर्भवती महिलांवरही आपला जीव धोक्यात घालून मुलाबाळांच्या आणि जनावरांसाठी पाणी आणण्याचे काम करावे लागत आहे.शासनाच्या अनास्थेने या वाडीतील ग्रामस्थ सतत किती भयंकर, भीषण अशा दुष्काळाला दरवर्षी सामोरे जात आहेत. याचा अनुभव घेतला तर कोणत्याही सहृदयी माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. २१ व्या शतकात प्रगतीच्या पोकळ आकडेवारीचा दस्ताऐवज सांभाळणाऱ्या शासनाला प्रत्यक्षात या तहानलेल्या वाड्या-वस्त्यांचे भीषण वास्तव कधी कळणार? हाच प्रश्न या धनगर वस्तीतील ग्रामस्थ विचारत आहेत. प्रशासनाने लक्ष घालून येथील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा व लोकांचे हाल थांबवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.देवरूखजवळील चाफवली, भोयरेवाडी व आसपासच्या गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला जात असून महिलांच्या डोक्यांवरचा हंडा अद्याप खाली आलेला नाही. हे चित्र किती दिवस राहणार केवळ २०० लोकवस्तीच्या वाडीतही पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायमच असून जलस्वराज्य योजनेतूनही वाडीला पाणी मिळाले नाही हे सत्य आहे.शासनाच्या अनास्थेने वाड्या वस्त्यांवरील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याबाबत वेळोवेळी चर्चा होऊनही अनेक वर्षे पिण्याचा प्रश्न सोडवू शखत नसल्याबद्दल तीव्र नाराजी आहे. वाडीतील जनावरांना पाणी उपलब्ध होत नाही. माणसांवरही पाण्याचे संकट कायम आहे. काही किलोमीटरचा प्रवास करूनही हाती एक हंडाही पाणी लागत नसल्यामुळे किती वर्षे वाट पाहायची असा प्रश्न विचारला जात असून तहानलेल्या वाड्यांवर पाणी कधी उपलब्ध होणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. केवळ २०० लोकवस्तीच्या वाडीतही पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायमच असून जलस्वराज्य योजनेतूनही वाडीला पाणी मिळाले नाही हे सत्य आहे.