शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील क्रिकेटपटूचा हैदराबादमध्ये हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:00 IST

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा ...

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा पॅव्हेलियनमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी हैदराबाद येथील मैदानावर घडली. वीरेंद्र विठ्ठल नाईक (वय ४१) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. तो मूळचा सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील असून, त्याचे पूर्ण कुटुंब हैदराबादमध्येच वास्तव्यास असते. वीरेंद्र हा एचएसबीसी बँकेकडून गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत होता. मंगळवारी त्याच्यावर आरोस येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. वीरेंद्र नाईक हा अनेक वर्षे हैद्राबाद येथे एचएसबीसी या बँकेत नोकरीला होता. तो मारडपल्ली क्रिकेट क्लबकडून खेळत होता. रविवारी झालेल्या सामन्यात वीरेंद्रने आपल्या संघासाठी ६६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला; पण पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून तो मैदानातून परतला होता. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बॅट तसेच ग्लोव्हज व पॅड काढून तो पुन्हा मॅच पाहण्यासाठी इतर खेळाडूंमध्ये येऊन बसला होता. यावेळी अचानक त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याला लागलीच हैद्राबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेनंतर क्रिकेट सामना तेथेच थांबविण्याचा निर्णय दोन्ही बाजूच्या कर्णधारांनी घेतला.या घटेनेनंतर वीरेंद्रच्या कुटुंबाला याबाबतची माहिती देण्यात आली. वीरेंद्रचे भाऊ अविनाश नाईक हे लागलीच रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी घडलेली घटना आपल्या नातेवाइकांना सांगितली. एका इंग्रजी वृत्तपत्राने वीरेंद्रच्या भावाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार वीरेंद्र हा गेले अनेक दिवस छातीत वेदना होत असल्याने वैद्यकीय उपचार घेत होता. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्याला पुढील आठ ते दहा दिवस क्रिकेट खेळू नको, असे सांगितले होते.दरम्यान, सोमवारी सकाळी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह त्याच्या सावंतवाडी तालुक्यातीलआरोस या मूळ गावी नेण्यासाठी हे कुटुंब निघाले होते. मंगळवारी सकाळपर्यंत ते गावी पोहोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.