शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सावंतवाडीतील क्रिकेटपटूचा हैदराबादमध्ये हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:00 IST

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा ...

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा पॅव्हेलियनमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी हैदराबाद येथील मैदानावर घडली. वीरेंद्र विठ्ठल नाईक (वय ४१) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. तो मूळचा सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील असून, त्याचे पूर्ण कुटुंब हैदराबादमध्येच वास्तव्यास असते. वीरेंद्र हा एचएसबीसी बँकेकडून गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत होता. मंगळवारी त्याच्यावर आरोस येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. वीरेंद्र नाईक हा अनेक वर्षे हैद्राबाद येथे एचएसबीसी या बँकेत नोकरीला होता. तो मारडपल्ली क्रिकेट क्लबकडून खेळत होता. रविवारी झालेल्या सामन्यात वीरेंद्रने आपल्या संघासाठी ६६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला; पण पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून तो मैदानातून परतला होता. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बॅट तसेच ग्लोव्हज व पॅड काढून तो पुन्हा मॅच पाहण्यासाठी इतर खेळाडूंमध्ये येऊन बसला होता. यावेळी अचानक त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याला लागलीच हैद्राबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेनंतर क्रिकेट सामना तेथेच थांबविण्याचा निर्णय दोन्ही बाजूच्या कर्णधारांनी घेतला.या घटेनेनंतर वीरेंद्रच्या कुटुंबाला याबाबतची माहिती देण्यात आली. वीरेंद्रचे भाऊ अविनाश नाईक हे लागलीच रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी घडलेली घटना आपल्या नातेवाइकांना सांगितली. एका इंग्रजी वृत्तपत्राने वीरेंद्रच्या भावाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार वीरेंद्र हा गेले अनेक दिवस छातीत वेदना होत असल्याने वैद्यकीय उपचार घेत होता. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्याला पुढील आठ ते दहा दिवस क्रिकेट खेळू नको, असे सांगितले होते.दरम्यान, सोमवारी सकाळी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह त्याच्या सावंतवाडी तालुक्यातीलआरोस या मूळ गावी नेण्यासाठी हे कुटुंब निघाले होते. मंगळवारी सकाळपर्यंत ते गावी पोहोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.