शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

सावंतवाडीतील क्रिकेटपटूचा हैदराबादमध्ये हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:00 IST

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा ...

सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा पॅव्हेलियनमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी हैदराबाद येथील मैदानावर घडली. वीरेंद्र विठ्ठल नाईक (वय ४१) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. तो मूळचा सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील असून, त्याचे पूर्ण कुटुंब हैदराबादमध्येच वास्तव्यास असते. वीरेंद्र हा एचएसबीसी बँकेकडून गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत होता. मंगळवारी त्याच्यावर आरोस येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. वीरेंद्र नाईक हा अनेक वर्षे हैद्राबाद येथे एचएसबीसी या बँकेत नोकरीला होता. तो मारडपल्ली क्रिकेट क्लबकडून खेळत होता. रविवारी झालेल्या सामन्यात वीरेंद्रने आपल्या संघासाठी ६६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला; पण पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून तो मैदानातून परतला होता. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बॅट तसेच ग्लोव्हज व पॅड काढून तो पुन्हा मॅच पाहण्यासाठी इतर खेळाडूंमध्ये येऊन बसला होता. यावेळी अचानक त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याला लागलीच हैद्राबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेनंतर क्रिकेट सामना तेथेच थांबविण्याचा निर्णय दोन्ही बाजूच्या कर्णधारांनी घेतला.या घटेनेनंतर वीरेंद्रच्या कुटुंबाला याबाबतची माहिती देण्यात आली. वीरेंद्रचे भाऊ अविनाश नाईक हे लागलीच रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी घडलेली घटना आपल्या नातेवाइकांना सांगितली. एका इंग्रजी वृत्तपत्राने वीरेंद्रच्या भावाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार वीरेंद्र हा गेले अनेक दिवस छातीत वेदना होत असल्याने वैद्यकीय उपचार घेत होता. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्याला पुढील आठ ते दहा दिवस क्रिकेट खेळू नको, असे सांगितले होते.दरम्यान, सोमवारी सकाळी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह त्याच्या सावंतवाडी तालुक्यातीलआरोस या मूळ गावी नेण्यासाठी हे कुटुंब निघाले होते. मंगळवारी सकाळपर्यंत ते गावी पोहोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.