शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सावंतवाडीवासीयांचा उद्या मूक मोर्चा

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात चार दिवसांपूर्वी विजेच्या तारा पडून संदीप गवस व सागर हुक्केरी यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गवस व हुक्केरी कुटुंबीयांसाठी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी भव्य मूक मोर्चातून प्रांताधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा या समितीतर्फे करणार असल्याची माहिती येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष उमेश कोरगावकर, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, सहाय्यक उपाध्यक्ष राजू पनवेलकर, सचिव संजू शिरोडकर, सहसचिव दिलीप भालेकर, खजिनदार आनंद नेवगी, सहखजिनदार नकुल पार्सेकर, कायदेविषयक सल्लागार सुभाष पणदूरकर तसेच सदस्य म्हणून बाबल्या दुभाषी, सतीश नार्वेकर, बाळ चोणकर, जयवंत कुलकर्णी, संजय पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडीतील दोघांचा बळी गेला आहे. या घटनेचा दोघांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी एकत्र येत सावंतवाडी नागरी कृती स्थापन केली आहे.शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रारंभ उभाबाजार-विठ्ठल मंदिर येथून होणार आहे. उभाबाजार, गांधी चौक, संचयनी पॅलेस, मोती तलाव, नगर परिषदमार्गे येथील प्रांत कार्यालयाकडे या मोर्चाचे विसर्जन होणार आहे. यावेळी निवेदन सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्षा संघटनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने शहरातील सर्व शाळांतील मुलांची गैरसोय होणार आहे. यामुळे सर्व शाळेतील संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे केले आहे. (वार्ताहर)मदतीसाठी कृती समिती करणार पाठपुरावागवस व हुक्केरी कु टुंबियांसाठी शासनाकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या रकमेस विलंब होऊ नये व त्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत सामाविष्ट करून घेण्याची मागणी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या सर्व मागण्या एका महिन्यात पूर्ण होण्यासाठी या कृती समितीतर्फे आंदोलने व पाठपुरावा करण्यात येणार आहे.