शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

मांडवी-राजिवडा किनारपट्टीला वाचवा

By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST

मांडवी ते राजीवडा : पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

रत्नागिरी : मांडवी ते राजीवडा किनाऱ्यावरील जनतेचे समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.तेथील नागरिक सन १९८८पासून आज २६ वर्षे प्रयत्न करीत आहेत. संबंधीत बंधाऱ्याची निविदा मंजूर झाली. मांडवी येथील बंधारा झाल्यामुळे तेथील नागरिकांचे संरक्षण झाले. पण पुढे घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा अपूर्ण राहिल्याने समुद्राच्या पाण्याने त्या ठिकाणी अतिक्रमण करुन काठावरील नागरिकांची वित्तहानी झाली. याठिकाणी बंधारा दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.बंधाऱ्यासाठी पाच कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून, तीन कोटीचे बांधकाम टी. एस. पवार या ठेकेदारांनी केल्याचे मे. बंदर अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदाराची कामाची रक्कम अदा न केल्याने पुढील बांधकाम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे काम या पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्याची प्रत बंदर अधिकारी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मेरी टाईम बोर्ड, आयुक्त, बंदर विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पाठविलेली आहे. पावसाळ्यापूर्वी घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा पूर्ण होणे आवश्यक आहे. तो न झाल्यास पावसाचे, समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या वस्तीत अतिक्रमण करुन वित्त व जीवितहानी होईल. समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या घरापर्यंत आलेले असल्याने नागरिकांनी गणपतीपुळे, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा बंधारा त्याप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे, अशी मागणी केली आहे. सिमेंट काँक्रीटचा बंधारा झाल्यास धोका टळेल, असे लोकाचे म्हणणे आहे. भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, सुरेंद्र घुडे, राजेंद्र विलणकर, राजेंद्र घुडे, अशोक मयेकर, मधुकर नागवेकर, विजय भाटकर, सतीश हातखंबकर, शिवराम विलणकर, अनंत भाटकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)1सव्वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर मांडवी येथील बंधारा मंजूर झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकला नाही. आता पालकमंत्री रवींद्र वायकर हे याबाबत हालचाली करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. 2घुडेवठार-विलणकरवाडी येथील बंधारा मात्र अद्याप अपूर्णच राहिल्याने समुद्री आक्रमणाचा धोका कायम असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे चित्र आहे.