शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मांडवी-राजिवडा किनारपट्टीला वाचवा

By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST

मांडवी ते राजीवडा : पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

रत्नागिरी : मांडवी ते राजीवडा किनाऱ्यावरील जनतेचे समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.तेथील नागरिक सन १९८८पासून आज २६ वर्षे प्रयत्न करीत आहेत. संबंधीत बंधाऱ्याची निविदा मंजूर झाली. मांडवी येथील बंधारा झाल्यामुळे तेथील नागरिकांचे संरक्षण झाले. पण पुढे घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा अपूर्ण राहिल्याने समुद्राच्या पाण्याने त्या ठिकाणी अतिक्रमण करुन काठावरील नागरिकांची वित्तहानी झाली. याठिकाणी बंधारा दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.बंधाऱ्यासाठी पाच कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून, तीन कोटीचे बांधकाम टी. एस. पवार या ठेकेदारांनी केल्याचे मे. बंदर अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदाराची कामाची रक्कम अदा न केल्याने पुढील बांधकाम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे काम या पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्याची प्रत बंदर अधिकारी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मेरी टाईम बोर्ड, आयुक्त, बंदर विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पाठविलेली आहे. पावसाळ्यापूर्वी घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा पूर्ण होणे आवश्यक आहे. तो न झाल्यास पावसाचे, समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या वस्तीत अतिक्रमण करुन वित्त व जीवितहानी होईल. समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या घरापर्यंत आलेले असल्याने नागरिकांनी गणपतीपुळे, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा बंधारा त्याप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे, अशी मागणी केली आहे. सिमेंट काँक्रीटचा बंधारा झाल्यास धोका टळेल, असे लोकाचे म्हणणे आहे. भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, सुरेंद्र घुडे, राजेंद्र विलणकर, राजेंद्र घुडे, अशोक मयेकर, मधुकर नागवेकर, विजय भाटकर, सतीश हातखंबकर, शिवराम विलणकर, अनंत भाटकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)1सव्वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर मांडवी येथील बंधारा मंजूर झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकला नाही. आता पालकमंत्री रवींद्र वायकर हे याबाबत हालचाली करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. 2घुडेवठार-विलणकरवाडी येथील बंधारा मात्र अद्याप अपूर्णच राहिल्याने समुद्री आक्रमणाचा धोका कायम असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे चित्र आहे.