शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सावरकर यांचे विचार सर्वस्पर्शी अन् सर्वकालीन

By admin | Updated: January 29, 2016 23:46 IST

नितीन गडकरी : २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

रत्नागिरी : माणसं बदलली, काळ बदलला मात्र प्रश्न तिथेच आहेत. सावरकरांचे साहित्य ज्वालामुखी सारखे आहे. समाजातील जातीयता, अस्पृश्यता, वाईट गोष्टी समूळ नष्ट होण्याची गरज आहे. सावरकरभक्तांनी पुरोगामी, प्रगतशील, समानतेचे पुरस्कर्ते, सर्वधर्मीयांना एकत्र करून जनजागरण करावे. सावरकरांचे विचार सर्वस्पर्शी असून, आजही उपयोगी पडणारे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष व राष्ट्रीय विमुक्त-भटक्या आणि अर्ध भटक्या जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी (दादा) इदाते, केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, खासदार अमर साबळे, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते.सावरकरांचे विचार व जीवन प्रेरणेचे स्त्रोत्र आहे. सावरकरांनी संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले. मात्र, देशाने त्यांच्या बाबतीत न्याय केला नाही. आज जगभरात आतंकवाद, अतिरेकी विचारांचे थैमान सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था उधळल्यामुळे अनेक निरपराधांचे बळी जात आहेत. पाकिस्तानात तर वाईट घटनांना वाईट म्हणण्याचीही ताकद चांगल्या माणसांमध्ये नाही, असे ते म्हणाले. सावरकरांचे साहित्य, जीवन जाज्वल्य आहे. सावरकरांचे विचार पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांचे स्वागत करून सत्कार केला. डॉ. विद्याधर करंदीकर लिखित ‘तेजोमय’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, १४७ वर्षाची परंपरा असलेले वाचनालय संस्कार व सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालयाचे नामकरण सावरकरांनी केले. हे संमेलनही संस्मरणीय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांनी सांगितले की, सावरकरांचे विचार हे जगण्याचे विचार होऊ शकतात. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्वाचे सूत्र असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद पाटणकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय साळवी, नगरसेवक उमेश शेट्ये राजन मलुष्टे, बबन पटवर्धन, दिलीप पाखरे, आनंद पाटणकर, कॅ.दिलीप भाटकर, विनायक हातखंबकर, शेखर पटवर्धन, रवींद्र साठे, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुपारी २.३० चा नियोजित कार्यक्रम दुपारी ३.४५ वाजता सुरू झाला. दीपप्रज्वलन, सत्कार, पुस्तक प्रकाशन व केंद्रीय मंत्री गडकरींचे अवघे दहा मिनिटांचे भाषण मिळून मोजून वीस मिनिटात दुपारी ४.०५ वाजता मंत्रीमहोदयांनी कार्यक्रम आटोपला. पतितपावन मंदिर येथून गं्रथदिंडीला प्रारंभ झाला. लक्ष्मीचौक येथील वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी रामनाका, जयस्तंभमार्गे संमेलनस्थळी आली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थीवर्ग तसेच सावरकर जीवनावर आधारीत चित्ररथ दिंडीत सहभागी झाला होता. खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल, विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष दादा इदाते, कार्याध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, पतितपावन संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबा परूळेकर, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले.