शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर यांचे विचार सर्वस्पर्शी अन् सर्वकालीन

By admin | Updated: January 29, 2016 23:46 IST

नितीन गडकरी : २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

रत्नागिरी : माणसं बदलली, काळ बदलला मात्र प्रश्न तिथेच आहेत. सावरकरांचे साहित्य ज्वालामुखी सारखे आहे. समाजातील जातीयता, अस्पृश्यता, वाईट गोष्टी समूळ नष्ट होण्याची गरज आहे. सावरकरभक्तांनी पुरोगामी, प्रगतशील, समानतेचे पुरस्कर्ते, सर्वधर्मीयांना एकत्र करून जनजागरण करावे. सावरकरांचे विचार सर्वस्पर्शी असून, आजही उपयोगी पडणारे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष व राष्ट्रीय विमुक्त-भटक्या आणि अर्ध भटक्या जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी (दादा) इदाते, केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, खासदार अमर साबळे, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते.सावरकरांचे विचार व जीवन प्रेरणेचे स्त्रोत्र आहे. सावरकरांनी संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले. मात्र, देशाने त्यांच्या बाबतीत न्याय केला नाही. आज जगभरात आतंकवाद, अतिरेकी विचारांचे थैमान सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था उधळल्यामुळे अनेक निरपराधांचे बळी जात आहेत. पाकिस्तानात तर वाईट घटनांना वाईट म्हणण्याचीही ताकद चांगल्या माणसांमध्ये नाही, असे ते म्हणाले. सावरकरांचे साहित्य, जीवन जाज्वल्य आहे. सावरकरांचे विचार पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांचे स्वागत करून सत्कार केला. डॉ. विद्याधर करंदीकर लिखित ‘तेजोमय’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, १४७ वर्षाची परंपरा असलेले वाचनालय संस्कार व सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालयाचे नामकरण सावरकरांनी केले. हे संमेलनही संस्मरणीय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांनी सांगितले की, सावरकरांचे विचार हे जगण्याचे विचार होऊ शकतात. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्वाचे सूत्र असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद पाटणकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय साळवी, नगरसेवक उमेश शेट्ये राजन मलुष्टे, बबन पटवर्धन, दिलीप पाखरे, आनंद पाटणकर, कॅ.दिलीप भाटकर, विनायक हातखंबकर, शेखर पटवर्धन, रवींद्र साठे, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुपारी २.३० चा नियोजित कार्यक्रम दुपारी ३.४५ वाजता सुरू झाला. दीपप्रज्वलन, सत्कार, पुस्तक प्रकाशन व केंद्रीय मंत्री गडकरींचे अवघे दहा मिनिटांचे भाषण मिळून मोजून वीस मिनिटात दुपारी ४.०५ वाजता मंत्रीमहोदयांनी कार्यक्रम आटोपला. पतितपावन मंदिर येथून गं्रथदिंडीला प्रारंभ झाला. लक्ष्मीचौक येथील वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी रामनाका, जयस्तंभमार्गे संमेलनस्थळी आली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थीवर्ग तसेच सावरकर जीवनावर आधारीत चित्ररथ दिंडीत सहभागी झाला होता. खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल, विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष दादा इदाते, कार्याध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, पतितपावन संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबा परूळेकर, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले.