शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी गॅस’ला शनिवारचा मुहूर्त

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

पहिल्या टप्प्यात ३०० मेगावॅट वीज निर्मिती : सर्व वीज रेल्वेला देणार

संकेत गोयथळे ल्ल गुहागर रत्नागिरी गॅस प्रकल्पातून रेल्वेसाठी ५०० मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व मंजुरी रेल्वेने मिळवल्या असून तब्बल दोन वर्षे वीज निर्मिती ठप्प असलेल्या या प्रकल्पातून शनिवार, २१ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील ३०० मेगावॅट वीज निर्मितीची सुरुवात होणार आहे. रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्पातील वीज घेण्यासाठी आवश्यक सेंट्रल इलेक्ट्रीकल रेग्युलेट्री अ‍ॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना काही दिवसांपूर्वी मिळाला होता. मात्र महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजुरी मिळणे बाकी होती. ही मंजुरी २१ नोव्हेंबरला मिळणार असून, याच दिवशी ८ वाजल्यानंतर ३०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली जाणार आहे. ही वीज महाराष्ट्रातील रेल्वेसाठी दिली जाणार आहे. रत्नागिरी गॅस प्रकल्पातून डिसेंबर २०१३ पासून वीज निर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून गॅस पुरवठा बंद झाल्याने व अन्य ठिकाणाहून महागड्या दराने मिळणाऱ्या गॅसवर निर्माण होणारी वीज महाग होत होती. अशा दुहेरी संकटात प्रकल्प सापडला होता. सत्ता बदलानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली होतील, हे अपेक्षित होते. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प सुरू करण्यास अनेक अडचणी असल्याचे जाहीर केल्यानंतर हा प्रकल्प बंद पडतो की काय, असे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली. काही दिवसांनी २ नोव्हेंबरचा मुहूर्तही घोषित करण्यात आला. मात्र वीज घेण्यासाठी आवश्यक परवानगी रेल्वेला मिळवण्यासाठी वेळ झाल्याने हा मुहूर्त टळला. यादरम्यान प्रकल्पाच्या तीन टप्प्यातून १९५० पैकी ५०० मेगावॅट वीज रेल्वे घेणार असल्याने संपूर्ण सज्जता महिनाभरापासूनच ठेवली आहे. टप्पा एक हाही सज्ज ठेवला आहे. टप्पा २ व ३ची क्षमता प्रत्यक्षात एक हजार मेगावॅटची आहे. दुसऱ्या टप्प्यात : २०० मेगावॅटने वीज वाढवणार ४रेल्वेकरिता ५०० मेगावॅट वीज घेतली जाणार असून, यामध्ये राज्य शासनाकडून आवश्यक परवानगी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील ३०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू होणार आहे. ४तसेच झारखंड व पश्चिम बंगालसाठी दोनशे मेगावॅट वीज दिली जाणार आहे. ४यासाठी आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वीज निर्मितीत आणखी २०० मेगावॅटने वाढवली जाणार आहे.