शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

साठे साहित्य संमेलन सावंतवाडीत होणे भाग्याच

By admin | Updated: January 15, 2015 23:29 IST

बबन साळगावकर : तयारी अंतिम टप्प्याते

सावंतवाडी : सहावे राज्यव्यापी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे होत असल्याने सावंतवाडीकरांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे. संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रातील सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यासाठी नगरपरिषदेतर्फे सर्व नगरसेवक या संमेलनाच्या सहकार्यासाठी वेळोवेळी उपस्थित राहणार असल्याचे सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, सुमेधा नाईक, नगरसेविका वैशाली पटेकर, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षपदी सतीश काळसेकर आहेत. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, हैदराबाद येथील ख्यातनाम लेखक, कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते असे मिळून सुमारे ४०० ते ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी ८ वाजता केशवसुत कट्टा येथून महाविद्यालयीन मुलांसह दिंडीला प्रारंभ होणार आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी व ग्रंथस्टॉलचे उद्घाटन हरिहर आठलेकर, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) व अध्यक्ष सतीश काळसेकर यांच्या स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष बबन साळगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याची दिशा यावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. माया पंडित (हैदराबाद), रणधीर शिंदे, नितीन रिंढे, आत्माराम लोमटे (जळगाव), डॉ. सुनील भिसे (वेंगुर्ले), प्रा. उदय रोटे (उल्हासनगर) सहभागी होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरा परिसंवाद ‘सांस्कृतिक आक्रमकांची सद्दी वाढत चालली आहे का?’ होणार आहे. अध्यक्षस्थानी राजा शिरगुप्पे असून निमंत्रित सचिन परब (गोवा), मुक्ता दाभोळकर (दापोली), श्रीकांत देशमुख (नांदेड), गणेश विसपुते (पुणे), डॉ. शिवाजीराव जवळगेकर (लातूर) यांचा सहभाग आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शाहिरी जलसा (सादरकर्ते शाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर आणि शाहीर शितल साठे, मुंबई). ६.३० ते ८.३० या वेळेत निमत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. १८ जानेवारी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत काय?’ हा परिसंवाद होणार आहे. संमेलनाचा समारोप १२.३० ते १.३० या वेळेत पालकमंत्री दीपक केसरकर, सतीश काळसेकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. राजन गवस, जयप्रकाश सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात चांगल्याप्रकारे दिल्याबद्दल बी. बी. गायतोंडे, समाजकारण ज्ञानेश देऊलकर, राजकारण व समाजकारण जयानंद मठकर, साहित्यिकांमध्ये हरिहर आठलेकर, शिक्षण क्षेत्रात कल्याणी कांबळी यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच वाचक स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणारआहे. (वार्ताहर)