शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सरपंचाच्या घरावर बहिष्कार

By admin | Updated: December 16, 2014 00:14 IST

मतदान केल्याचा राग : केळुस कालवीवाडी येथील घटना

वेंगुर्ले : मागील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केले, या रागातून कालवीवाडीतील ग्रामस्थांनी घरावर बहिष्कार टाकला असल्याची तक्रार केळूस सरपंच करिश्मा खवणेकर व पत्रकार कृष्णा खवणेकर यांनी निवती पोलीस ठाण्यात केली आहे.विधानसभा निवडणुकीवेळी कालवीवाडीतील मच्छिमार ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपला भाऊ, भावजय व वडील यांनी ग्रामस्थांच्या भीतीपोटी मतदान केले नाही. मात्र, आपण पत्रकार असल्याने व पत्नी करिश्मा ही केळूस गावची प्रथम नागरिक असल्याने आम्ही दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचा राग आल्याने कालवीवाडीतील ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी सभा घेतली. या सभेत माझा भाऊ विद्याधर खवणेकर यास बोलावून गणाधीश केळूसकर यांनी धमकावले. तुझ्या भाऊ व भावजय यांनी मतदान केल्याने आजपासून तुमच्याकडे कोणत्याही कार्यक्रमास मच्छिमार समाजातील कोणीही येणार नसल्याचे सांगून घरावर बहिष्कार टाकला. त्यानंतरही गावातील काही लोक आमच्याकडे येत जात होते. त्या रागातून बाबुराव ताम्हणकर, महेश राऊळ, गोविंद केळूसकर, सुदाम राऊळ, केशव ताम्हणकर, कृष्णा राऊळ यांनी मच्छिमार बांधवांना भडकावून पुन्हा ५ डिसेंबर रोजी बैठक घेतली. या बैठकीस आपणासही बोलाविण्यात आले होते. त्यावेळी तू मतदान केलेस म्हणजे काय, असे आपणास धमकावण्यास आले. त्यावेळी आपण वस्तुस्थिती कथन केली असता, पत्रकाराने मतदान केलेच पाहिजे असा शासननिर्णय आहे का, असल्यास तो दाखव. तरच आम्ही तुझ्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊ, असेही सांगितले. वाडीतील लोकांच्या दबावाखाली बळी पडून मच्छिमार समाजाने संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरील व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)