शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाण्यासाठी रक्त सांडू !

By admin | Updated: April 7, 2017 00:16 IST

कांदळगाव ग्रामस्थ; सर्जेकोट-मिर्याबांदला पाणी नाही

मालवण : कांदळगाव गाव तहानलेला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नसतानाही दुसऱ्या गावाला कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा करू देणार नाही. २०१० साली ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यानंतर योजना बासनात गुंडाळण्याची कार्यवाही शासनाकडून वरवर करण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध व ग्रामसभेचा ठराव झुगारून जबरदस्तीने नळपाणी योजनेचे काम सुरु केले, तर पाण्याच्या थेंबासाठी रक्त सांडू, पण गावातून पाण्याचा एकही थेंब दुसऱ्या गावाला देणार नाही, असा इशारा ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला. कांदळगाव गावाची विशेष ग्रामसभा येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी उमेश कोदे, सरपंच बाबू राणे, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे, माजी सरपंच उमदी परब, निकिता कदम, वैभव राणे, भाग्यश्री डिचोलकर, ग्रामसेवक ए. बी. पेढे यांच्यासह राजेंद्र कोदे, राजेंद्र कदम, विकास आचरेकर, राजन लाड आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.सभेत कांदळगावचे पाणी सर्जेकोट मिर्याबांद गावाला देण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेला कांदळगाव ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून योजना साकारण्यास आल्यास न्यायालयीन लढा लढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामसभेच्या निर्णयाच्या प्रती आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांना पाठविण्यात याव्यात, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.