शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पाण्यासाठी रक्त सांडू !

By admin | Updated: April 7, 2017 00:16 IST

कांदळगाव ग्रामस्थ; सर्जेकोट-मिर्याबांदला पाणी नाही

मालवण : कांदळगाव गाव तहानलेला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नसतानाही दुसऱ्या गावाला कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा करू देणार नाही. २०१० साली ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यानंतर योजना बासनात गुंडाळण्याची कार्यवाही शासनाकडून वरवर करण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध व ग्रामसभेचा ठराव झुगारून जबरदस्तीने नळपाणी योजनेचे काम सुरु केले, तर पाण्याच्या थेंबासाठी रक्त सांडू, पण गावातून पाण्याचा एकही थेंब दुसऱ्या गावाला देणार नाही, असा इशारा ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला. कांदळगाव गावाची विशेष ग्रामसभा येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी उमेश कोदे, सरपंच बाबू राणे, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे, माजी सरपंच उमदी परब, निकिता कदम, वैभव राणे, भाग्यश्री डिचोलकर, ग्रामसेवक ए. बी. पेढे यांच्यासह राजेंद्र कोदे, राजेंद्र कदम, विकास आचरेकर, राजन लाड आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.सभेत कांदळगावचे पाणी सर्जेकोट मिर्याबांद गावाला देण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेला कांदळगाव ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून योजना साकारण्यास आल्यास न्यायालयीन लढा लढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामसभेच्या निर्णयाच्या प्रती आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांना पाठविण्यात याव्यात, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.