शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

सांगेली, पिंगुळीत अग्नितांडव

By admin | Updated: April 25, 2017 22:52 IST

वाडिवरवडेतही आग : २५ एकरांतील बागायती होरपळल्या; कौलाच्या कारखान्यातील लाकूड खाक

सावंतवाडी/कुडाळ : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली-घोलेवाडी येथे मंगळवारी दुपारी २५ एकरांमधील आंबा, काजू, बांबू बागायती जळून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे व पिंगुळी या दोन गावात सोमवारी मध्यरात्री आगीचे भीषण तांडव निर्माण झाले. यामध्ये वाडीवरवडेतील एका घराला सोमवारी रात्री व पिंगुळीतील कौल कारखान्याच्या जळावू लाकडांना मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने या दोन्हीही ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली असली तरी या आगीने हजारो रूपयांचे नुकसान झाले.सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वाडीवरवडे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वडाच्या झाडाला आग लागली. वाढत्या तापमानामुळे लागलेली ही आग हळूहळू पसरत जवळच असलेल्या एका स्टॉलला व नंतर स्टॉलला लागून असलेल्या घराला लागली. आग लागल्याचे समजताच घरातील मंडळींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणत मोठी हानी टाळली. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पिंगुळी येथील कौल कारखान्याला लागूनच ठेवलेल्या जळावू लाकडाच्या भागातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी खातरजमा केली असता तेथील जळावू लाकडे पेटताना दिसून आली. त्याने तत्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाला याची माहीती दिली. पण अग्नीशमन येईपर्यंत ही आग सर्व जळावू लाकडांपर्यंत पोहोचल्याने आगीने रौद्र्ररूप धारण केले होते. उन्हाच्या वाढता कडाक्याने वाळलेली लाकडे क्षणार्धात या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण एका बंबाने ही आग आटोक्यात आली नाही, परिणामी या बंबाने तीन फेऱ्या मारल्या तर यावेळी पाणी टँकरही मागविण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. दरम्यान, तीन जेसीबीच्या सहाय्याने आगीत बचावलेली जळावू लाकडे कंपनीपासून काही अंतरावर नेऊमोठी हानी टाळली. या दोन्हीही आगी कशामुळे लागल्या याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटनेच ही आग लागल्याचा अंदाज स्थानिक व्यक्त करत होते. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली-घोलेवाडी येथे मंगळवारी दुपारी २५ एकरमधील आंबा, काजू, बांबू आदी बागायती जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान, ही आग एका संशयित व्यक्तीकडून लावली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगेली ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांत धाव घेत संबंधीत व्यक्तीवर करण्याची मागणी केली. (वार्ताहर)संशयिताकडून आगी लावण्याचे प्रकारसांगेली येथे पंधरा दिवसांपासून संंंबंधित संशयित व्यक्तीकडून बागायतींना आग लावण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. शिवाय त्या व्यक्तीमार्फत अनेकांना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या व्यक्तीने सांगेली येथील महादेव कदम यांचे जळावू लाकूड, बिदाजी चव्हाण, रामा राऊळ, सदानंद सांगेलकर यांच्या काजू बागेला, तर अशोक देसाई यांच्या भाताच्या उडवीला आग लावून मोठे नुकसान केले. अनेकांनी त्याला असे प्रकार करताना रंगेहात पकडले आहे. आज त्याने पुन्हा आग लावल्याने येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर चौकशीअंती संबंधित व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.अग्निशमनची दमछाककुडाळ तालुक्यातील या दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. वाडीवरवडेतील आग विझविल्यानंतर अग्निशमन दल असे स्थानापन्न होते तोच पिंगुळीतील आग विझविण्यासाठी पुन्हा त्यांना तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.