शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

वाळूमाफीया अन् अधिकारीही धास्तावले

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

‘लोकमत’चे वृत्त : चार वर्षांपासून किनारा उखडण्याचे षडयंत्र

रत्नागिरी : शहरातील पांढरा समुद्र किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात झालेल्या बेकायदा वाळू उपसाप्रकरणी ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वाळू माफीया व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चार वर्षांपासून किनारपट्टी उखडून टाकण्याच्या सुरू असलेल्या या षडयंत्रात सहभागी असलेल्या सर्वांचाच तपास होण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीकरांतून होत आहे.रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथील किनारा नेमका कोठे आहे, हे शोधावा लागण्याची स्थिती आहे. संपूर्ण किनाराच खड्डयात गेला आहे. वाळू माफीयांनी येथील पांढरी वाळू उपसा करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहेच, परंतु या प्रकरणात मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचीही जोरदार चर्चा आहे. हे व्यवहार कोणाशी झाले याबाबतही ही चर्चा रंगली आहे. पांढरा समुद्र येथील बेकायदा वाळू उपसाप्रकरण हे आज कालचे नसून तब्बल चार वर्षांपासून हा उपसा सुरू आहे. त्यामुळे हा किनारा आता असुरक्षित बनला आहे. या ठिकाणच्या वाळू उपसावर पोट भरणारे काही वाहनचालक आहेत. काहींनी या चोरट्या वाळूतील फायद्यातून वाहनेही घेतली आहेत. याबाबतची तपशीलवार माहिती ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपध्दतीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पांढरा समुद्र येथे वाळूच्या ढिगाऱ्याजवळ उभा असलेला तो जेसीबी कोणाचा होता? त्याबाबत महसूल खात्याने काही माहिती घेऊन कारवाई केली आहे काय? जी वाहने पांढऱ्या समुद्रावर वाळूसाठी जात होती ती कोणाची होती, याची माहिती घेतली आहे काय? मिरकरवाड्यातील मुख्य रस्त्यापासून पांढरा समुद्र किनाऱ्यापर्यंत दगड-मातीचा रस्ता नेमका कोणी व कशासाठी बनवला? याची माहिती घेण्यात आली काय? जर हा रस्ता शासनाने उभारला असेल तर त्याची माहिती लोकांना आहे काय? शासनाने उभारलेला नसेल व हा रस्ता बेकायदा असेल व त्यावरून चोरलेली वाळू वाहनांतून नेली जात आहे, हे माहिती असताना हा रस्ता उखडून टाकण्याची काही व्यवस्था शासकीय स्तरावर केली गेली आहे काय? असे अनेक प्रश्न रत्नागिरीकरांसमोर उभे ठाकले आहेत. पांढरा समुद्र किनाऱ्याप्रमाणेच आरे-वारे, काळबादेवी, नेवरे, ढोकमळे यासारख्या भागातही सागरी किनाऱ्यावरील वाळूची चोरी होत आहे. त्यासाठी बैलगाड्यांचा वापर केला जात आहे. पांढरा समुद्र किनाऱ्यावरील वाळू चोरीचा विषय ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच अन्य भागातील वाळू माफीयाही धास्तावले आहेत. तरीही त्या भागात हे प्रकार सुरूच आहेत. (प्रतिनिधी) वाळूवरील रेघोट्या...बेकायदा वाळू उपसाप्रकरणी एक गुप्त फतवाही निघाल्याची चर्चा आहे. ‘काय ते करा, पण प्रसारमाध्यमांत काही येणार नाही याची काळजी घ्या’. या गुप्त सल्ल्याची अंमलबजावणी वाळू माफीयांनी केली. त्यासाठी काही जणांच्या गटाला हाताशी धरून सर्व काही नीट ‘सेट’ करण्यात आले. मात्र, याबाबतची माहिती बाहेर फुटली व चर्चेला उधाण आले. या वाळूवर ज्यांनी रेघोट्या मारल्या त्यांच्याबाबत चर्चाही जोरात सुरू झाली आहे.मिरकरवाड्यातील गाळाचा ढीगाराही पोखरलामिरकरवाडा बंदरातील गाळाची वाळू ड्रेझरने उपसा करून पांढरा समुद्र किनाऱ्यावरच टाकण्यात आली आहे. हा वाळूचा ढिगाराही अनेक ठिकाणी वाळू माफीयारुपी घुशींनी पोखरला आहे. बाहेरून दिसणारा ढिगारा आतून किती पोखरला गेला आहे, याची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी व कर्मचाऱ्यांमार्फत मोजमाप घेऊन किती ब्रास वाळूची चोरी झाली, शासनाचे किती नुकसान झाले, याचा हिशेब मांडून या सर्व स्थितीला जबाबदार असणाऱ्यांकडून शासनाचे झालेले हे लाखो रुपयांचे नुकसान भरून घ्यावे. त्याशिवाय बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांना व त्यांना अभय देणाऱ्यांना चाप बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत जनतेत समाधान असून, त्यांच्याकडून या माफीयांवर काही कारवाई होईल, वाळू चोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जाईल, अशी रत्नागिरीकरांना अपेक्षा आहे.