शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जिल्ह्यातील वाळू प्रश्न पेटणार

By admin | Updated: April 13, 2015 00:37 IST

आंदोलनाचा इशारा : वायंगणीतील व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय

आचरा : जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उत्खनन लिलाव प्रक्रिया न झाल्याने आणि मुदतवाढही न देता वाहतूक अनधिकृत ठरवत लाखो रुपयांचा दंड महसूल विभाग करीत आहे. वाळूप्रश्नी येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व डंपर उभे करून शासकीय बांधकामेही करू देणार नाही, अशी संतप्त भूमिका वाळू व डंपर व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली.मालवण तालुक्यातील कर्ली कालावल खाडीपात्रातील वाळू व डंपर व्यावसायिकांची बैठक रविवारी सायंकाळी वायंगणी-आचरा येथील स्वामी समर्थ मठात झाली. यावेळी प्रशासनाच्या वाळू कारवाई व रखडलेल्या भूमिकेबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत गेल्या तीन वर्षांत केवळ पाच महिने वाळू लिलाव टेंडर झाले असताना शासनाची कामे होतात व त्यांना परवानगी मिळते. ही वाळू येते कोठून? असा संतप्त सवाल करीत वाळू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्यास प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहेत, अशा भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या. शासन आमची रोजीरोटी हिरावत आहे. कर्जबाजारी होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो रुपयांचे कर्ज घरदार, जमीन व दागिने तारण ठेवून आम्ही घेतले आहे, हे फेडायचे कसे? मुदतवाढीला जिल्हाधिकारी उत्तर देत नाहीत. हरित न्यायालय निर्णयानंतर आमच्या टेंडर मुदतीतील गेलेले ५८ दिवस याबाबतही निर्णय नाही, पैसेही परत नाही व मुदतवाढही नाही.आमचे कोट्यवधी रुपये शासनाकडे जमा आहेत. असे असताना वाळू व्यावसायिकांना मुदतवाढ नाही. नव्याने टेंडर प्रक्रिया नाही. (पान ८ वर) वाळू उत्खनन अनधिकृत ठरवत कारवाई होते. ही कारवाई प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी आहे. जिल्ह्याबाहेरही वेगळे दर आहेत. मात्र, मालवण तालुक्यात ६० हजार रुपये आणि आता तर लाखो रुपये दंड करण्यात आला आहे. मात्र शासकीय कामांना वाळू मिळते. ती कामे होतात. मग ती वाळू अधिकृत कशी? असा संतप्त सवालही करण्यात आला. एकूणच वाळू व डंपर व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाटमाथा व अन्य प्रांतातील वाळू माफियांसारखे आम्ही नाही. आम्ही सर्वसामान्य असे एकत्र येऊन रोजीरोटीसाठी या व्यवसायात आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले. तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आदरच करीत असल्याचे सांगितले. या बैठकीत वाळूप्रश्नी येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व डंपर उभे करू व शासकीय बांधकामेही करू देणार नाही, अशी संतप्त भूमिका वाळू व डंपर व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली. तर याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांची येत्या दोन दिवसांत भेट घेऊन याबाबत निवेदनही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी वाळू व डंपर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (वार्ताहर)