शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शृंगारतळीच्या बाजारात बारमाही भाजीपाला विक्री

By admin | Updated: June 1, 2015 00:14 IST

राजेंद्र भंडारी : गुहागरातील एकमेव प्रगतशील शेतकरी

संकेत गोयथळे-गुहागर -तालुक्यातील गिमवी कोष्टेवाडी येथील राजेंद्र गंगाराम भंडारी यांनी बारमाही शेती व भाजीपाला लागवडीतून कुटुुंबाचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. शृंगारतळी येथे होणाऱ्या आठवडा बाजारामध्ये बारमाही भाजीपाला विक्री करणारे ते तालुक्यातील एकमेव शेतकरी आहेत.भंडारी यांची वडिलोपार्जीत साडेतीन एकर जागा आहे. आई-वडीलांबरोबर पारंपरिक भातशेती करताना शेती व्यवसायातच आवड निर्माण झाली. अन्य दोन भाऊ गाडी व्यवसायामध्ये आहेत. मात्र भंडारी यांनी पारंपरिक शेतीतून पुढे शास्त्रीयदृष्ट्या हंगामी नियोजन करुन बारमाही शेती कशी करावी याची कला मेहनतीने अवगत केली आहे. साडेतीन एकर जागेचे शेतीसाठी योग्य नियोजन करुन एक एकरमध्ये वर्षाला ३ टन कलिंगड उत्पादन, एक एकरमध्ये भाजीपाला लागवड व एक एकरमध्ये भातशेती केली जाते.यामध्येही भाजीपाला लागवड करताना थंडीमध्ये कलिंगडाबरोबरच मिरची, वांगी, कारली, चवळी आदी पिके तर एप्रिल, मे मध्ये भेंडी, काकडी व पडवळ आदी पिके घेतात. याकामी पत्नी, दोन मुलेही मेहनत करत असतात. त्यांचा एक मुलगा दहावी शिकत आहे तर मोठ्या मुलाने शेतीमध्ये विशेष आवड असल्याने पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती व्यवसायाचे प्रगत तंत्र अवगत व्हावे यासाठी अ‍ॅग्रीकल्चर डिप्लोमा करत आहे.नुसतेच बारमाही पीक घेऊन भंडारी थांबत नाहीत तर कुठल्याही नाशिवंत मालाला तात्काळ बाजारपेठ आवश्यक असते. हे लक्षात घेऊन शृंगारतळी येथील आठवडा बाजारात दरवेळी किमान दहा हजारांचा भाजीपाला ते विकतात. या बाजारात बहुतांशी भाजीपाला विकणारे हे बाहेर गावातून येतात. पण भंडारी या स्पर्धेत टिकून आपला व्यवसाय करताना दिसतात.अशा स्थितीत येथे बारमाही भाजीपाला विकणारे ते एकमेव शेतकरी आहेत. भाजीपाल्याबरोबरच ते गावठी बियाण्याची विक्री करतात. पावसाळ्यापूर्वी याला मोठी मागणी असते. त्यामुळे भंडारी यांनी या कामात विशेष लक्ष घातले आहे. अन्य शेतकरी शेतीबाबत अनास्था व्यक्त करत असताना दुसरीकडे भंडारी यांनी शेतीमध्ये आगळा प्रयोग केला आहे. नुसताच केला नाही तर तो यशस्वी करून दाखवला आहे.ज्या ठिकाणी भाजीपाला लागवड करतात तेथेच त्यांचे घर आहे. जागेमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी स्वखर्चाने विहिर केली आहे. शासकीय योजनेतून २५ नारळ लावले आहेत. अशा पद्धतीने केवळ मेहनतीने शेती करुन वर्षभराचे नियोजन करुन बारमाही शेती करण्याचे तंत्र अन्य शेतकऱ्यांनी घेऊन केवळ नोकरीच्या पाठी न धावता स्वकर्तृत्वावर स्वतंत्रे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र भंडारी व्यक्त करतात.