शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बाप्पाने ऐकले भक्तांचे गाऱ्हाणे!

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

पुढच्या वर्षी लवकर या : २०१७मध्ये २५ आॅगस्टला आगमन

अरूण आडिवरेकर --रत्नागिरी --‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष दरवर्षी भक्तगण मोठ्या उत्कंठेने करतात. या जयघोषानंतर सर्वजण गणेशाची वाट पाहात असतात. यावर्षी भक्तांनी घातलेली ही हाक गणपती बाप्पाने ऐकली असून, पुढच्या वर्षी एक - दोन दिवस नव्हे; तर तब्बल ११ दिवस अगोदर गणरायाचे आगमन होणार आहे.कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवाची चाहुल लागली की, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता असते. या उत्सवाला कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेलेली व्यक्ती रजा घेऊन आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येते. कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस, काहीजण तर अकरा दिवस गणेशाची पूजा करून त्याची आराधना करतात. या उत्सव काळात गावोगावी आरती, भजने, जाखडी यांचे सूर ऐकायला मिळतात. संपूर्ण वातावरण मंगलमय आणि भक्तीमय झालेले असते.गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्याच्या विसर्जनाची वेळ आली की, साऱ्यांचे अंत:करण दाटून येते. आपल्या घरी आलेला गणराय जाऊच नये, अशी भावना साऱ्यांचीच असते. तरीही त्याच्या आगमनाप्रमाणे विसर्जनाची जय्यत तयारी केली जाते. विसर्जनावेळी आपला लाडका लवकरच घरी यावा, यासाठी सारेचजण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करतात. यावर्षी भक्तांची ही विनवणी गणरायाने ऐकली असून, पुढच्या वर्षी सन २०१७मध्ये ११ दिवस आधी म्हणजे २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. एवढेच नव्हे; तर गणपती बाप्पाचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणेशाची सेवा करण्याची आणखीन संधी मिळणार आहे.