शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

बाप्पाने ऐकले भक्तांचे गाऱ्हाणे!

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

पुढच्या वर्षी लवकर या : २०१७मध्ये २५ आॅगस्टला आगमन

अरूण आडिवरेकर --रत्नागिरी --‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष दरवर्षी भक्तगण मोठ्या उत्कंठेने करतात. या जयघोषानंतर सर्वजण गणेशाची वाट पाहात असतात. यावर्षी भक्तांनी घातलेली ही हाक गणपती बाप्पाने ऐकली असून, पुढच्या वर्षी एक - दोन दिवस नव्हे; तर तब्बल ११ दिवस अगोदर गणरायाचे आगमन होणार आहे.कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवाची चाहुल लागली की, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता असते. या उत्सवाला कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेलेली व्यक्ती रजा घेऊन आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येते. कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस, काहीजण तर अकरा दिवस गणेशाची पूजा करून त्याची आराधना करतात. या उत्सव काळात गावोगावी आरती, भजने, जाखडी यांचे सूर ऐकायला मिळतात. संपूर्ण वातावरण मंगलमय आणि भक्तीमय झालेले असते.गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्याच्या विसर्जनाची वेळ आली की, साऱ्यांचे अंत:करण दाटून येते. आपल्या घरी आलेला गणराय जाऊच नये, अशी भावना साऱ्यांचीच असते. तरीही त्याच्या आगमनाप्रमाणे विसर्जनाची जय्यत तयारी केली जाते. विसर्जनावेळी आपला लाडका लवकरच घरी यावा, यासाठी सारेचजण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करतात. यावर्षी भक्तांची ही विनवणी गणरायाने ऐकली असून, पुढच्या वर्षी सन २०१७मध्ये ११ दिवस आधी म्हणजे २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. एवढेच नव्हे; तर गणपती बाप्पाचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणेशाची सेवा करण्याची आणखीन संधी मिळणार आहे.