शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाने ऐकले भक्तांचे गाऱ्हाणे!

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

पुढच्या वर्षी लवकर या : २०१७मध्ये २५ आॅगस्टला आगमन

अरूण आडिवरेकर --रत्नागिरी --‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष दरवर्षी भक्तगण मोठ्या उत्कंठेने करतात. या जयघोषानंतर सर्वजण गणेशाची वाट पाहात असतात. यावर्षी भक्तांनी घातलेली ही हाक गणपती बाप्पाने ऐकली असून, पुढच्या वर्षी एक - दोन दिवस नव्हे; तर तब्बल ११ दिवस अगोदर गणरायाचे आगमन होणार आहे.कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवाची चाहुल लागली की, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता असते. या उत्सवाला कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेलेली व्यक्ती रजा घेऊन आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येते. कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस, काहीजण तर अकरा दिवस गणेशाची पूजा करून त्याची आराधना करतात. या उत्सव काळात गावोगावी आरती, भजने, जाखडी यांचे सूर ऐकायला मिळतात. संपूर्ण वातावरण मंगलमय आणि भक्तीमय झालेले असते.गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्याच्या विसर्जनाची वेळ आली की, साऱ्यांचे अंत:करण दाटून येते. आपल्या घरी आलेला गणराय जाऊच नये, अशी भावना साऱ्यांचीच असते. तरीही त्याच्या आगमनाप्रमाणे विसर्जनाची जय्यत तयारी केली जाते. विसर्जनावेळी आपला लाडका लवकरच घरी यावा, यासाठी सारेचजण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करतात. यावर्षी भक्तांची ही विनवणी गणरायाने ऐकली असून, पुढच्या वर्षी सन २०१७मध्ये ११ दिवस आधी म्हणजे २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. एवढेच नव्हे; तर गणपती बाप्पाचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणेशाची सेवा करण्याची आणखीन संधी मिळणार आहे.