शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साहिल कालसेकर अखेर गजाआड चिपळूण पोलिसांची कामगिरी

By admin | Updated: July 30, 2015 00:05 IST

तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे

चिपळूण : कुख्यात गुंड साहिल कालसेकर याला रात्री दीडच्या दरम्यान चिपळूण पोलिसांनी देवरूख येथे सापळा लावून पकडले. पळून गेल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याच्याकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पळालेल्या तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साहिल अजमल कालसेकर या कुख्यात गुंडाने बुधवारी (दि. १५ जून) रुग्णालयातून पलायन केले होते. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, साहिलला शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेची सूत्रे त्यांनी चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे दिली होती. त्यानुसार मकेश्वर यांनी पाठलाग सुरू केला होता.जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर साहिल बेलबाग येथे गेला. त्यानंतर दोन दिवस त्याचा मुक्काम रत्नागिरी येथे होता. तेथून तो मुंबईला गेला. परत देवरूख येथे आला व पुन्हा मुंबई येथे गेला होता. मुंबईहून परत तो देवरूख येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. साहिलच्या पाठीवर असलेल्या पोलीस निरीक्षक मकेश्वर यांना साहिलची माहिती मिळत होती; परंतु तो सतत मोबाईलचे सीमकार्ड बदलत होता. त्याची ठिकाणे सतत बदलत होती. एखाद्या ठिकाणावर पोलीस पोहोचले की, तो तेथून गायब असायचा. देवरूख येथील गिरीराज हॉटेलजवळ साहिल येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, हवालदार अमोल यादव, गगनेश पटेकर, उमेश भागवत, संदीप नाईक, राजेश चव्हाण, राजू गाडीवट्ट, विजय खामकर व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे रमीज शेख यांनी सापळा रचला होता. (पान ८वर)(पान १ वरुन) या कामगिरीत मकेश्वर यांना रमीज शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अनेक नागरिकांनीही त्यांना हस्ते परहस्ते मदत केली. रात्री १.३०च्या सुमारास हॉटेल गिरीराजजवळ साहिल मोबाईलवर बोलत होता. या दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरमधून साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी त्याला घेरले व शरण येण्यास सांगितले. परंतु, सातत्याने पोलिसांवर हल्ला करण्याची सवय असलेल्या साहिलने नेहमीप्रमाणे पोलिसांच्या दिशेने चाकू भिरकावला. सुदैवाने तो चाकू कोणाला लागला नाही आणि पोलिसांनी साहिलला रंगेहाथ पकडले. रात्रीच त्याला चिपळूण येथे आणण्यात आले.साहिलकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. साहिलला पकडण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पातळीवर घरझडत्या घेतल्या. मुंबईतील डोंगरी, दादर, मिरारोड, ठाणे येथेही शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. दरम्यान, काही काळ तो मार्गताम्हाणे व पनवेल परिसरात काहींना आढळला होता. १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर साहिल पोलिसांच्या हाती सापडला. साहिलला अटक झाल्याचे समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात आले. साहिलला दुपारी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी स्वत: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)पोलिसांना चकविण्यासाठी बदलला लूक रत्नागिरी ते मुंबई, मुंबई ते देवरूख असा प्रवास करताना साहिल पनवेल, मुंबके व मार्गताम्हाणे येथेही गेला होता. खेड, सावर्डे मोहल्ला व संगमेश्वर परिसरात या काळात चोरीला गेलेल्या मोटारसायकलीही त्यानेच चोरल्या असाव्यात. मुंबकेहून दुचाकीने तो सावर्डे येथे आला. तेथे पेट्रोल संपल्याने ती गाडी तेथेच सोडून दुसरी दुचाकी घेऊन तो देवरूखकडे गेला होता. साहिलने आपला नेहमीचा लूकही बदलला आहे.