शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

साहिल कालसेकर अखेर गजाआड चिपळूण पोलिसांची कामगिरी

By admin | Updated: July 30, 2015 00:05 IST

तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे

चिपळूण : कुख्यात गुंड साहिल कालसेकर याला रात्री दीडच्या दरम्यान चिपळूण पोलिसांनी देवरूख येथे सापळा लावून पकडले. पळून गेल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याच्याकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पळालेल्या तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साहिल अजमल कालसेकर या कुख्यात गुंडाने बुधवारी (दि. १५ जून) रुग्णालयातून पलायन केले होते. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, साहिलला शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेची सूत्रे त्यांनी चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे दिली होती. त्यानुसार मकेश्वर यांनी पाठलाग सुरू केला होता.जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर साहिल बेलबाग येथे गेला. त्यानंतर दोन दिवस त्याचा मुक्काम रत्नागिरी येथे होता. तेथून तो मुंबईला गेला. परत देवरूख येथे आला व पुन्हा मुंबई येथे गेला होता. मुंबईहून परत तो देवरूख येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. साहिलच्या पाठीवर असलेल्या पोलीस निरीक्षक मकेश्वर यांना साहिलची माहिती मिळत होती; परंतु तो सतत मोबाईलचे सीमकार्ड बदलत होता. त्याची ठिकाणे सतत बदलत होती. एखाद्या ठिकाणावर पोलीस पोहोचले की, तो तेथून गायब असायचा. देवरूख येथील गिरीराज हॉटेलजवळ साहिल येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, हवालदार अमोल यादव, गगनेश पटेकर, उमेश भागवत, संदीप नाईक, राजेश चव्हाण, राजू गाडीवट्ट, विजय खामकर व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे रमीज शेख यांनी सापळा रचला होता. (पान ८वर)(पान १ वरुन) या कामगिरीत मकेश्वर यांना रमीज शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अनेक नागरिकांनीही त्यांना हस्ते परहस्ते मदत केली. रात्री १.३०च्या सुमारास हॉटेल गिरीराजजवळ साहिल मोबाईलवर बोलत होता. या दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरमधून साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी त्याला घेरले व शरण येण्यास सांगितले. परंतु, सातत्याने पोलिसांवर हल्ला करण्याची सवय असलेल्या साहिलने नेहमीप्रमाणे पोलिसांच्या दिशेने चाकू भिरकावला. सुदैवाने तो चाकू कोणाला लागला नाही आणि पोलिसांनी साहिलला रंगेहाथ पकडले. रात्रीच त्याला चिपळूण येथे आणण्यात आले.साहिलकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. साहिलला पकडण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पातळीवर घरझडत्या घेतल्या. मुंबईतील डोंगरी, दादर, मिरारोड, ठाणे येथेही शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. दरम्यान, काही काळ तो मार्गताम्हाणे व पनवेल परिसरात काहींना आढळला होता. १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर साहिल पोलिसांच्या हाती सापडला. साहिलला अटक झाल्याचे समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात आले. साहिलला दुपारी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी स्वत: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)पोलिसांना चकविण्यासाठी बदलला लूक रत्नागिरी ते मुंबई, मुंबई ते देवरूख असा प्रवास करताना साहिल पनवेल, मुंबके व मार्गताम्हाणे येथेही गेला होता. खेड, सावर्डे मोहल्ला व संगमेश्वर परिसरात या काळात चोरीला गेलेल्या मोटारसायकलीही त्यानेच चोरल्या असाव्यात. मुंबकेहून दुचाकीने तो सावर्डे येथे आला. तेथे पेट्रोल संपल्याने ती गाडी तेथेच सोडून दुसरी दुचाकी घेऊन तो देवरूखकडे गेला होता. साहिलने आपला नेहमीचा लूकही बदलला आहे.