शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दिनाबाबत उदासिनता

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

बळीराजा नाराज : कृ षी विद्यापीठालाही पडला विसर

शिवाजी गोरे - दापोली --सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची जयंती २९ आॅगस्ट रोजी असते. हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हरताळ फासल्याचे निदर्शनास आल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे - पाटील यांचा जयंती दिन २९ आॅगस्ट हा आहे. हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, २९ आॅगस्ट रोजी सरकारी सुटी आल्याने अनेक सरकारी कार्यालयात शेतकरी दिन साजरा झालाच नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठाप्रमाणेच सरकारी कार्यालयांना सहकारमहर्षींबद्दल किती सहानुभूती आहे, हे दिसून येत आहे. विठ्ठलराव विखे-पाटील हे कृ षी औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्यप्रवर्तक आहेत. त्यांनी आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना काढला. सन १९२३ मध्ये लोणी (बु.) जि. अहमदनगर येथे पहिल्या सहकारी पतपेढीची स्थापना करुन सहकाराची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली होती. आशिया खंडातील शेतकऱ्यांच्या मालकीची उभारणीही केली होती.त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने १९६२ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता. प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना करुन ग्रामीण भागात घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा आणली होती.विखे - पाटील यांनी शिक्षण व सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल पुणे विद्यापीठाने डी. लीट, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी डॉक्टर आॅफ सायन्स ही सन्मानाची पदवी देऊन गौरविले होते. असे महान कार्य असणाऱ्या सहकार महर्षींच्या कार्याचा गौरव होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २९ आॅगस्ट शेतकरी दिन म्हणून पाळण्याचे आदेश दिले असले तरी सरकारी खाती व कृषी विद्यापीठांना त्यांचा विसर पडला आहे.महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठाने त्यांची जयंती साजरी करुन महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला आहे. महाराष्ट्र शासनाची सर्व सरकारी कार्यालये व विद्यापीठाच्या विविध भागांमध्ये शेतकरी दिन साजरा करण्यासंदर्भातील परिपत्रकही पोहोचले नसल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विद्यापीठाच्या उदासीन धोरणाबाबत काय निर्णय घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.