शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सदानंद साळुंखेंचा होणार सन्मान

By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST

पर्यटकांचा जीव वाचविला : पोलीस महासंचालकांकडून दखल

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबोली दूरक्षेत्र येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे यांनी गेळे नदीतून वाहत जाणाऱ्या दोन पर्यटकांचा जीव वाचविला होता. या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलीस महासंचालकांनी घेत त्यांना सन्मानचिन्ह जाहीर केले असून त्याचे वितरण १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार आहे.आंबोली गाव हे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असून पावसाळ्यात आंबोली हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असल्याने गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर भागातील पर्यटक याठिकाणी आनंद लुटण्यासाठी भेटी देत असतात. १५ जून २०१२ रोजी आंबोली येथे दिवसभरात सरासरी ७५० मिमी पाऊस पडला होता. त्यादिवशी अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे हे आंबोली परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक एस. एन. टाळेकर यांनी साळुंखे यांना गेळे नदीच्या पात्रातून दोन पर्यटक वाहून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे लागलीच साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गेळे नदीच्या ठिकाणी पोचून वाहून जात असलेल्या शंकर पाटील व आनंदा देवगौडा (हुबळी) या दोन पर्यटकांचे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरीबाबत सदानंद साळुंखे यांना पोलीस महासंचालक मुंबई यांनी ९ एप्रिल २०१५ च्या आदेशान्वये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले असून १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या (ओरोस) संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)