शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.चा मार्ग न बदलण्याचा निर्णय

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

के. बी. देशमुख : पुणे-कोल्हापूरमार्गे वळवण्याचा निर्णय स्थगित

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, मुंबईकर कोकणाकडे निघाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या पुणे-कोल्हापूरमार्गे वळवण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नेहमीच्या मार्गावरून या गाड्या धावणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. यावर्षी कोकणात १९०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० गाड्या जादा आहेत. पैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. अवजड वाहतूकदारांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळणार आहे. गणपतीसाठी कोकणात खासगी कारने जाणारे अनेक प्रवासीही याच मार्गाने जातात. या मार्गावर आधीच वाहतुकीचा भार असताना एस. टी.च्या १९०० जादा गाड्या या मार्गावरून वळविल्या, तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याचा धोका असल्याचे एस. टी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय ८० ते ९० किलोमीटरच्या जादा अंतरामुळे मुंबईकरांना प्रवासाचा त्रास होईल. शिवाय इंधनाचा वापर वाढेल. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एस. टी.ला १५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. शिवाय मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी वेळेत पोहोचणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. संबंधित बाबी लक्षात घेऊन एस. टी.ची वाहतूक पूर्वीच्या मार्गावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. त्यासाठी महामंडळाने महामार्गावर गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनातर्फे रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)