शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
3
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
4
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
5
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
7
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
8
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
9
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
10
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
11
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
12
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
13
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
14
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
15
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
16
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
17
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
18
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
19
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
20
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

एस. टी.चा मार्ग न बदलण्याचा निर्णय

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

के. बी. देशमुख : पुणे-कोल्हापूरमार्गे वळवण्याचा निर्णय स्थगित

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, मुंबईकर कोकणाकडे निघाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या पुणे-कोल्हापूरमार्गे वळवण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नेहमीच्या मार्गावरून या गाड्या धावणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. यावर्षी कोकणात १९०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० गाड्या जादा आहेत. पैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. अवजड वाहतूकदारांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळणार आहे. गणपतीसाठी कोकणात खासगी कारने जाणारे अनेक प्रवासीही याच मार्गाने जातात. या मार्गावर आधीच वाहतुकीचा भार असताना एस. टी.च्या १९०० जादा गाड्या या मार्गावरून वळविल्या, तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याचा धोका असल्याचे एस. टी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय ८० ते ९० किलोमीटरच्या जादा अंतरामुळे मुंबईकरांना प्रवासाचा त्रास होईल. शिवाय इंधनाचा वापर वाढेल. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एस. टी.ला १५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. शिवाय मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी वेळेत पोहोचणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. संबंधित बाबी लक्षात घेऊन एस. टी.ची वाहतूक पूर्वीच्या मार्गावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. त्यासाठी महामंडळाने महामार्गावर गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनातर्फे रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)