शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

सत्ताधाऱ्यांनी राज्यावर नांगर फिरविला : राज

By admin | Updated: October 12, 2014 01:04 IST

सावंतवाडीत घणाघात : प्रचारसभेत चारही पक्षांना केले टार्गेट

सावंतवाडी : राज्यातील चारही प्रमुख पक्षांची अवस्था दयनीय आहे. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. नीतीमत्ता नावाची गोष्ट नाही, राज्यकर्ते नालायक आहेत, त्यापुढे जाऊन विरोधी पक्षही नालायक आहे. राज्यातील स्थिती भयावह आहे, एकीकडे राज्यात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दुष्काळ वाढत चाललाय. सत्ताधाऱ्यांनी तर महाराष्ट्रावर नांगर फिरविला, अशा ठाकरी शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शनिवारी चौफेर टीकेची झोड उठविली. ते सावंतवाडी येथे प्रचारसभेत बोलत होते.राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी येथील जिमखाना मैदानावर झाली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही सभा होत असल्याने मैदान गर्दीने तुफान भरून गेले होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते शिरीष पारकर, मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, कोल्हापूरचे उमेदवार सुरेश साळोखे, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, धीरज परब, चैताली भेंडे, भारती रावराणे, आदी उपस्थित होते.भाजपकडे नीतीमत्ता नाहीयावेळी ठाकरे म्हणाले, भाजपकडे नीतिमत्ता राहिली नाही. त्यांचे पंतप्रधान येऊन महाराष्ट्रात मते मागत आहेत. ही मते कोणासाठी मागतात? काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आलेल्या ६० जणांसाठी मागत आहेत का? ज्या पक्षाने विधानसभेत बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान फिरत आहेत, यावरूनच भाजपची नीतीमत्ता कळते.आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. अनेक बाबतीत महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवले आहे. राज्याचा विकास पर्यटनमधून होऊ शकतो. प्रचंड ताकद पर्यटनमध्ये असताना यांच्याकडे साधा आराखडाही नाही. राज्याला पर्यटनातून दहा ते बारा हजार कोटी आणि दहा ते बारा हजार युवकांना काम मिळवून देईल, असा आराखडा तयार आहे.हापूस आंबा भय्या विकतोकोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आंबा प्रकिया उद्योग दिसत नाही. सभा तीन तास उशिरा सुरूमनसेची सभा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे हे तीन तास उशिरा आल्याने ही सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. तरीही भर उन्हात गर्दी तशीच टिकून होती.राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करीत असताना भाजप उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता टीका केली. पहिले जनता दल, नंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि त्यानंतर अचानक भाजप असे पक्षांतर त्यांनी केले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अवघे सात दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना तो पक्ष सहा रात्री आणि सात दिवसांचा हनिमून पॅकेज वाटला काय? अशी टीका ठाकरे यांनी केली.