शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी राज्यावर नांगर फिरविला : राज

By admin | Updated: October 12, 2014 01:04 IST

सावंतवाडीत घणाघात : प्रचारसभेत चारही पक्षांना केले टार्गेट

सावंतवाडी : राज्यातील चारही प्रमुख पक्षांची अवस्था दयनीय आहे. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. नीतीमत्ता नावाची गोष्ट नाही, राज्यकर्ते नालायक आहेत, त्यापुढे जाऊन विरोधी पक्षही नालायक आहे. राज्यातील स्थिती भयावह आहे, एकीकडे राज्यात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दुष्काळ वाढत चाललाय. सत्ताधाऱ्यांनी तर महाराष्ट्रावर नांगर फिरविला, अशा ठाकरी शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शनिवारी चौफेर टीकेची झोड उठविली. ते सावंतवाडी येथे प्रचारसभेत बोलत होते.राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी येथील जिमखाना मैदानावर झाली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही सभा होत असल्याने मैदान गर्दीने तुफान भरून गेले होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते शिरीष पारकर, मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, कोल्हापूरचे उमेदवार सुरेश साळोखे, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, धीरज परब, चैताली भेंडे, भारती रावराणे, आदी उपस्थित होते.भाजपकडे नीतीमत्ता नाहीयावेळी ठाकरे म्हणाले, भाजपकडे नीतिमत्ता राहिली नाही. त्यांचे पंतप्रधान येऊन महाराष्ट्रात मते मागत आहेत. ही मते कोणासाठी मागतात? काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आलेल्या ६० जणांसाठी मागत आहेत का? ज्या पक्षाने विधानसभेत बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान फिरत आहेत, यावरूनच भाजपची नीतीमत्ता कळते.आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. अनेक बाबतीत महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवले आहे. राज्याचा विकास पर्यटनमधून होऊ शकतो. प्रचंड ताकद पर्यटनमध्ये असताना यांच्याकडे साधा आराखडाही नाही. राज्याला पर्यटनातून दहा ते बारा हजार कोटी आणि दहा ते बारा हजार युवकांना काम मिळवून देईल, असा आराखडा तयार आहे.हापूस आंबा भय्या विकतोकोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आंबा प्रकिया उद्योग दिसत नाही. सभा तीन तास उशिरा सुरूमनसेची सभा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे हे तीन तास उशिरा आल्याने ही सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. तरीही भर उन्हात गर्दी तशीच टिकून होती.राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करीत असताना भाजप उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता टीका केली. पहिले जनता दल, नंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि त्यानंतर अचानक भाजप असे पक्षांतर त्यांनी केले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अवघे सात दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना तो पक्ष सहा रात्री आणि सात दिवसांचा हनिमून पॅकेज वाटला काय? अशी टीका ठाकरे यांनी केली.