शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

आरवली येडगेवाडी रस्ता धोकादायक

By admin | Updated: January 23, 2016 23:28 IST

‘बांधकाम’चे दुर्लक्ष : मोरी मोडकळीला आल्याने धोका

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येडगेवाडी हा प्रमुख रस्ता धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्यावरील कुचांबे - बौध्दवाडी येथील मोरी मोडकळीस आली आहे. ही मोरी कधीही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरुन सध्या एस. टी.च्या पाच फेऱ्या होतात. या मार्गावर कुटगिरी, राजीवली, रातांबी या तीन गावातील ६३हून अधिक शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी दररोज प्रवास करतात. या मार्गावरील एस. टी. अथवा अन्य वाहतूक बंद झाल्यास विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. ही बाब प्रवाशांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. मात्र, शासनाने जिल्ह््यातील प्रमुख सर्व मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर केले. त्याअगोदर जिल्हा परिषदेकडून या मोरीच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी या मोरीचे १६ लाखाचे अंदाजपत्रक तयार करुन मंजुरीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवले होते. मात्र, हा प्रमुख मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर अंदाजपत्रक आणि मंजुरी हा विषय थांबवण्यात आला. जिल्हा परिषदेकडे हा रस्ता असताना तुकाराम येडगे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. जिल्हा परिषदेने हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या गडनदी प्रकल्पामुळे खराब झाला असल्याचे नमूद करत, यासाठी पाटबंधारे विभागाने या मोरीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. येडगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मोडकळीस आलेल्या पुलाच्या ठिकाणी भेट दिली व पुलाची पाहणी केली. मात्र, नंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. कुचांबे (बौध्दवाडी) येथील मोरीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व उपअभियंता यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या मोरीची पाहणी करुन घेतो, असे आश्वासन दिले. या आश्वासनाला महिना उलटून गेला तरीही सार्वजनिकचे कोणतेही अधिकारी याठिकाणी फिरकले नाहीत. या मार्गावरील मोडकळीला आलेल्या मोरीचा साकव कार्यक्रमात समावेश करुन ही मोरी या हंगामात बांधून घ्यावी. अन्यथा या मार्गावरील वाहतूक बंद होऊन विद्यार्थी व तीन गावातील रहिवाशांना याचा फटका बसणार आहे. या विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास तीन गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरुन सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे तुकाराम येडगे व सचिन पाटोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)