शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘तिलारी’च्या रूंदावत्या पात्रामुळे धोका

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

नदीकाठची जमीन ढासळतेय : बागायतदार शेतकऱ्यास प्रशासनाकडून उपाययोजना हव्यात

वैभव साळकर - दोडामार्ग  -तिलारी नदीच्या रुंदावणाऱ्या पात्रामुळे नदीकाठच्या शेतीबागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस नदीचे पात्र रुंदावत असून पात्र नदीकाठची कित्येक मीटर जमीन गिळंकृत करत असल्याने शासनाने आवश्यक त्या ठिकाणी नदीतील गाळ दूर करण्याची मागणी नदीकाठच्या बागायतदारांतून होत आहे. तालुक्यातील सीमावर्ती भागातून तिलारी घाटातील डोंगरातून खराडी येथून तिलारी नदीचा उगम होतो. पुढे वीजघर येथील वीजनिर्मिती केंद्रात चंदगड तालुक्यातील धामणे धरणातील बाोगद्याद्वारे सोडण्यात येणारे पाणीही मुळस-वीजघर येथे तिलारी नदीला मिळते. परिणामी पावसात अगोदरच तिलारी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असताना त्यात वीज केंद्रात धामणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तिलारी नदीपात्रातील पाण्यात वाढ होते. त्यामुळे पावसाळाभर तिलारी नदीपात्र दुथडी भरून वाहते व नदीला मोठा पूर येतो. या पुराच्या पाण्यामुळे तिलारी नदीचे पात्र आपसुकच रूंदावते. त्यातच तिलारी नदीत वीजघर येथे धामणे धरणातून वीजघरच्या वीजकेंद्र्रातून सोडण्यात येणारे पाणी पुढे तेरवण-मेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यात अडविले जाते व तिथे वीज निर्मिती केली जाते. मात्र, तेरवण-मेढे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित असल्याने तेथे पाणी अधिक काळ साठविता येत नाही. परिणामी उन्नेयी बंधाऱ्यांच्या गेटवरून अतिरिक्त पाणी पुढे तिलारी नदीतून धाव घेते आणि अशी परिस्थिती उद्भवल्या कारणाने तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या सर्व गेट उघडणे तिलारी प्रकल्पाला भाग पडते. त्यामुळे तिलारी नदीला पूर येतो. तिलारी येथे आयनोडे-सरगवे येथील नदीवर धरण बांधण्यात आलेल्या नदीचा पूर्वी तिलारीत संगम व्हायचा. मात्र, आता धरण पूर्ण झाल्याने नदीचे एक पात्र पूर्णत: बंद झाले. परिणामी उन्नेयी बंधाऱ्यातून वेगाने येणारे पाणी तिलारी येथील निंबाळकर यांच्या शेती बागायतीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घुसत असल्याने तेथे सुमारे २५ ते ३० मीटर नदीचे पात्र रूंदावले आहे. त्यामुळे तेथेच असलेल्या तिलारी येथील मोठ्या पुलाला आता मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या तिलारीकडील पायथ्याच्या काही भागाचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे पुलाला धोका अधिकच गडद झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासूनचा नदीचा प्रवाहही दिवसेंदिवस बदलत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या शेतीबागायतीही तिलारी नदी गिळंकृत करते आहे. त्यातच नदीपात्रात साचलेला गाळ व वाढलेल्या झाडी यामुळे नदीचा प्रवाह सातत्याने बदलत आहे. तिलारी, भटवाडी, घोडगेवाडी, कोनाळकट्टा, साटेली भेडशी, परमे, कुडासे ते मणेरीपर्यंतच्या सर्वच बागायतदारांनी आता तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राचा मोठा धसका घेतला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराने तिलारी नदीचे पात्र अधिकच रुंदावले आहे. त्यामुळे शासनाने यावर वेळीच उपाययोजना करून नदीकाठच्या आमच्या बागायती वाचवाव्यात, अशी मागणी बागायतदार नागरिकांतून केली जात आहे. शासनानेही या तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राच्या समस्येवर योग्य तोडगा वेळीच शोधणे उचित ठरेल.नदीच्या पुलाचेही भवितव्य अडचणीत तिलारी येथील पुलालाही नदीच्या रूंदावत्या पात्रामुळे भविष्यात धोका संभवतो आहे. तिलारी प्रकल्पाकडे तेथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करूनही प्रकल्पाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या पुलाचे भवितव्यही धोक्यात आहे.