शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाचलचा धोका टळला

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

राजापूर तालुका : गाळ उपसल्याने पाण्याचा प्रवाह जैसे थे

राजापूर : पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचा वक्र झालेला प्रवाह शासनाच्या लघुपाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने आतील गाळ उपसल्याने पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.पाचल बाजारपेठेला मागील काही वर्षांपासून अर्जुना नदीचा धोका होता. दरवर्षी महापुराच्या पाण्यात नदीकाठची होणारी धूप यामुळे लगतच्या ओणी, अणुस्कुरा मार्गासहीत पाचल बाजारपेठेला धोका वाढला होता. दरवर्षी तो वाढतच होता. हा धोका लक्षात घेऊन मागील अनेक वर्षे प्रशासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण ते अपूर्ण पडले. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर पाचलचे माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. बाजारपेठेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना त्यांनी करण्याबाबत विनंती केली होती.त्याची दखल प्रशासनाने घेतली व पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील एकूण तीन ठिकाणी गाळ उपशाचे काम हाती घेतले. काही फूट नदीपात्रातील गाळ उपसून तो काठावर टाकण्यात आला. यामुळे नदीचे पात्र अधिकच रुंद झाले.या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या उमा शंकर पाथरे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी गावचे उपसरपंच किशोर नारकर, लघुपाटबंधारे विभागाचे कशेळकर, भोसले, एकनाथ शेलार, किसन शेलार, मनोहर पाटील, ग्रामस्थ शिरीष सक्रे, सुशांत वायकूळ, अण्णा पाथरे, प्रसाद पायरे, मंगेश पाथरे, गजानन नेवरेकर, हेमंत नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, राजन लब्धे, बब्या बंदरकर उपस्थित होते. अर्धा ते १ किमीच्या भागात नदीच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. नेमके त्याच ठिकाणी पाचल पेठवाडीवासीयांची स्मशानभूमी, जांगलदेव देवस्थान व गणेश विसर्जन घाट अशी महत्त्वाची ठिकाणे होती. पावसाळी दिवसात अर्जुना नदीला महापूर आल्यानंतर लगतची स्मशानभूमी पाण्याखाली जायची. त्यामुळे अडचण होत असे. गणेश विसर्जनाच्या वेळीही पुराच्या पाण्यामुळे अडथळा यायचा. या सर्व समस्यांबाबत पाचलचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर अडचण समजावून सांगितली. शिवाय सातत्याने पत्रवहार करुन पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रशासनाने सरत्या उन्हाळी हंगामात जेसीबी मशिनद्वारे अर्जुना नदीपात्रात साचलेल्या अनावश्यक गाळाचा उपसा केला. त्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पहिल्या पुराचा प्रवाह संथ होता. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.प्रशासनाने योग्यवेळी कार्यवाही केल्याने पाचलचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागासहीत त्यांच्या यांत्रिक विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)