शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पाचलचा धोका टळला

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

राजापूर तालुका : गाळ उपसल्याने पाण्याचा प्रवाह जैसे थे

राजापूर : पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचा वक्र झालेला प्रवाह शासनाच्या लघुपाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने आतील गाळ उपसल्याने पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.पाचल बाजारपेठेला मागील काही वर्षांपासून अर्जुना नदीचा धोका होता. दरवर्षी महापुराच्या पाण्यात नदीकाठची होणारी धूप यामुळे लगतच्या ओणी, अणुस्कुरा मार्गासहीत पाचल बाजारपेठेला धोका वाढला होता. दरवर्षी तो वाढतच होता. हा धोका लक्षात घेऊन मागील अनेक वर्षे प्रशासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण ते अपूर्ण पडले. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर पाचलचे माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. बाजारपेठेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना त्यांनी करण्याबाबत विनंती केली होती.त्याची दखल प्रशासनाने घेतली व पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील एकूण तीन ठिकाणी गाळ उपशाचे काम हाती घेतले. काही फूट नदीपात्रातील गाळ उपसून तो काठावर टाकण्यात आला. यामुळे नदीचे पात्र अधिकच रुंद झाले.या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या उमा शंकर पाथरे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी गावचे उपसरपंच किशोर नारकर, लघुपाटबंधारे विभागाचे कशेळकर, भोसले, एकनाथ शेलार, किसन शेलार, मनोहर पाटील, ग्रामस्थ शिरीष सक्रे, सुशांत वायकूळ, अण्णा पाथरे, प्रसाद पायरे, मंगेश पाथरे, गजानन नेवरेकर, हेमंत नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, राजन लब्धे, बब्या बंदरकर उपस्थित होते. अर्धा ते १ किमीच्या भागात नदीच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. नेमके त्याच ठिकाणी पाचल पेठवाडीवासीयांची स्मशानभूमी, जांगलदेव देवस्थान व गणेश विसर्जन घाट अशी महत्त्वाची ठिकाणे होती. पावसाळी दिवसात अर्जुना नदीला महापूर आल्यानंतर लगतची स्मशानभूमी पाण्याखाली जायची. त्यामुळे अडचण होत असे. गणेश विसर्जनाच्या वेळीही पुराच्या पाण्यामुळे अडथळा यायचा. या सर्व समस्यांबाबत पाचलचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर अडचण समजावून सांगितली. शिवाय सातत्याने पत्रवहार करुन पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रशासनाने सरत्या उन्हाळी हंगामात जेसीबी मशिनद्वारे अर्जुना नदीपात्रात साचलेल्या अनावश्यक गाळाचा उपसा केला. त्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पहिल्या पुराचा प्रवाह संथ होता. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.प्रशासनाने योग्यवेळी कार्यवाही केल्याने पाचलचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागासहीत त्यांच्या यांत्रिक विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)