शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

पाचलचा धोका टळला

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

राजापूर तालुका : गाळ उपसल्याने पाण्याचा प्रवाह जैसे थे

राजापूर : पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचा वक्र झालेला प्रवाह शासनाच्या लघुपाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने आतील गाळ उपसल्याने पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.पाचल बाजारपेठेला मागील काही वर्षांपासून अर्जुना नदीचा धोका होता. दरवर्षी महापुराच्या पाण्यात नदीकाठची होणारी धूप यामुळे लगतच्या ओणी, अणुस्कुरा मार्गासहीत पाचल बाजारपेठेला धोका वाढला होता. दरवर्षी तो वाढतच होता. हा धोका लक्षात घेऊन मागील अनेक वर्षे प्रशासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण ते अपूर्ण पडले. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर पाचलचे माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. बाजारपेठेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना त्यांनी करण्याबाबत विनंती केली होती.त्याची दखल प्रशासनाने घेतली व पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील एकूण तीन ठिकाणी गाळ उपशाचे काम हाती घेतले. काही फूट नदीपात्रातील गाळ उपसून तो काठावर टाकण्यात आला. यामुळे नदीचे पात्र अधिकच रुंद झाले.या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या उमा शंकर पाथरे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी गावचे उपसरपंच किशोर नारकर, लघुपाटबंधारे विभागाचे कशेळकर, भोसले, एकनाथ शेलार, किसन शेलार, मनोहर पाटील, ग्रामस्थ शिरीष सक्रे, सुशांत वायकूळ, अण्णा पाथरे, प्रसाद पायरे, मंगेश पाथरे, गजानन नेवरेकर, हेमंत नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, राजन लब्धे, बब्या बंदरकर उपस्थित होते. अर्धा ते १ किमीच्या भागात नदीच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. नेमके त्याच ठिकाणी पाचल पेठवाडीवासीयांची स्मशानभूमी, जांगलदेव देवस्थान व गणेश विसर्जन घाट अशी महत्त्वाची ठिकाणे होती. पावसाळी दिवसात अर्जुना नदीला महापूर आल्यानंतर लगतची स्मशानभूमी पाण्याखाली जायची. त्यामुळे अडचण होत असे. गणेश विसर्जनाच्या वेळीही पुराच्या पाण्यामुळे अडथळा यायचा. या सर्व समस्यांबाबत पाचलचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर अडचण समजावून सांगितली. शिवाय सातत्याने पत्रवहार करुन पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रशासनाने सरत्या उन्हाळी हंगामात जेसीबी मशिनद्वारे अर्जुना नदीपात्रात साचलेल्या अनावश्यक गाळाचा उपसा केला. त्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पहिल्या पुराचा प्रवाह संथ होता. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.प्रशासनाने योग्यवेळी कार्यवाही केल्याने पाचलचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागासहीत त्यांच्या यांत्रिक विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)