शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हस्तलिखित सातबारा

By admin | Updated: December 11, 2015 23:47 IST

आॅनलाईनचा फज्जा : राजन साळवींच्या प्रस्तावाला महसूलमंत्र्यांची मान्यता.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आॅनलाईन सातबारा प्रक्रियेतील उडालेल्या गोंधळातून सातबाराधारकांना आमदार राजन साळवी यांनी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सुसह्यता मिळवून दिली आहे. पुन्हा लवकरच हस्तलिखित सातबारा उपलब्ध होणार आहेत.राज्यातील सातबाराधारक शेतकरी, गरीब, अशिक्षित सर्वसामान्य मंडळींना संगणकप्रणालींचे सातबारे तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी आॅनलाईन सातबारा हा कार्यक्रम राबविणेत येत आहे. परंतु, कित्येक सातबारा हे अत्यंत जुन्या कालावधीतील असल्याने जीर्ण नोंदवहीतील नोंदी,अपुरा कर्मचारीवर्ग, सातत्याने सातबारा नोंदीत होणारे बदल यामुळे आॅनलाईन सातबारा कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. सदरील आॅनलाईन सातबारा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने हस्तलिखित सातबारा वितरीत करणेवर निर्बंध आले. या शासन आदेशाची अंमलबजावणी तहसीलदार,मंडल अधिकारी व तलाठी आदींकडून केली जात आहे. परिणामी अशिक्षित गरीब शेतकरी, सर्वसामान्य मंडळी यांची मोठया प्रमाणावर कुचंबणा होत असून, सातबारा उपलब्ध होत नसलेने याच्याशी संबंधीत सर्व कामे ठप्प झाली आहेत. सर्वसामान्य जनतेला शासनाच्या या उपक्रमामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी महसूल मंत्री नामदार एकनाथ खडसे यांची नागपूर येथे चालू अधिवेशनादरम्यान भेट घेतली. याबाबत आमदार साळवी यांनी या आॅनलाईन सातबारा प्रक्रियेमुळे उद्भवलेली समस्या ध्यानी आणून दिली. तसेच आॅनलाईन सातबारा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हस्तलिखित सातबारे वितरीत करणेत यावेत, अशी मागणी केली. महसूलमंत्री खडसे यांनीही आमदार साळवी यांच्या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाला याबाबतचे आदेश लिखित स्वरुपात तातडीने पाठविले केले. समाजातील अशिक्षित,गरीब तसेच शेतकरी आदी घटकांसाठी मांडलेल्या प्रस्तावाला खडसे यांनी तत्काळ अनुकूलता दर्शविल्याने आता हस्तलिखित सातबारा उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)अडचण : सातबारा उतारा अद्ययावत नाहीशासनाने आॅनलाईन सातबारा उतारा देण्याची मोहीम हाती आखली होती. त्यानंतर त्याचे काम सुरूही झाले. मात्र, आॅनलाईन मिळणारे सातबारा उतारा अद्ययावत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिकांना जुना सातबारा उतारा मिळत असल्याने अडचण निर्माण होत आहे.तलाठ्यांकडून अपूर्ण कामआॅनलाईन सातबारा संगणकीकृत करण्याचे काम शासनाने तलाठ्यांकडे दिले होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागातील सातबारा अपडेट झालेले नाहीत.अधिवेशनादरम्याने आमदार राजन साळवींनी मांडली व्यथा.सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना.जिल्हा प्रशासनाला तत्काळ आदेश पाठविणार.शेतकऱ्यांमध्ये समाधान.