शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भात शेतीतही क्रांती करा

By admin | Updated: July 27, 2015 22:56 IST

विनायक राऊत : कुडाळ येथे राईस मिलचे उद्घाटन

कुडाळ : राईस मिलच्या उभारणीने येथील शेतीला नवी दिशा तसेच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत ऊस पिकाप्रमाणेच भातपिकातही क्रांती करावी, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.कुडाळ एमआयडीसी बजाज सिंधुदुर्ग राईस मिल लिमिटेड कंपनीचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मिल्सचे मालक सज्जन बजाज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, शंकर कांबळी, उद्योजक पुष्कराज कोले, सुभाष मयेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कुडाळ सरपंच स्रेहल पडते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, भाजपा तालुकाप्रमुख बब्रुवान भगत, काका कुडाळकर, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, मिल्सचे संचालक यतीन मयेकर, अनिल जैन, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, संजय भोगटे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, युती शासनाचे आम्ही सेवक असून नुसत्या घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष कृती करतो. शेतकऱ्यांनी आता दुबार शेती करावी व त्यामध्ये चांगल्या प्रतीचे भातपीक घ्यावे. शेतकऱ्यांच्या जीवनात राईस मिल मोलाचा प्रकल्प असून परंपरागत शेती तंत्र बदलून आधुनिक पद्धती वापरून शेतीत नवनवीन भात पिके घ्यावीत, असे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सर्व जनतेच्या विकासासाठी आमचे सदैव प्रयत्न असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यास आपण कटीबद्ध आहोत. भात गिरणीमुळे जिल्ह्यातील भात गोडाऊनमध्ये राहणार नाही, तर या मिलमधील अत्याधुनिक पध्दतीत असलेल्या स्टोअर्समध्ये राहील. तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांनी याठिकाणी एमआयडीसी आणून उद्योगनगरी उभी केली. मात्र, त्यानंतर आलेल्या येथील उद्योगमंत्र्यानी एकही उद्योग याठिकाणी आणला नाही, असा टोला विरोधकांना लगावला. आम्ही केलेल्या विकासानेच टीकाकारांची तोंडे आपोआपच बंद होतील, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले. आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासामध्ये ही भातगिरण महत्त्वाची भूमिका बजावेल व त्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अतुल काळसेकर, पुष्पसेन सावंत, शंकर कांबळी व इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या भातगिरणीमध्ये दरदिवशी २०० टन भातावर प्रक्रिया केली जाणार असून, या भात गिरणीबरोबरच येथील फळावर फळप्रक्रिया उद्योगही सुरु करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही भात गिरण येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी प्रतिक्रिया मिल्सचे मालक बजाज यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रसाद देवधर, बापू नाईक, रामानंद शिरोडकर, सुहास सावंत, सुमित भोगले, उमेश ठाकूर, शिवाजीदादा कुबल, रमाकांत मल्हार व इतरांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित मान्यवर व जनतेला पेरूच्या कलमांचे वाटप बजाज मिल्सच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)झपाट्याने विकास राज्यातील सिंधुदुर्ग व पंढरपूर हे दोन जिल्हे सरकारने मायक्रो प्लॅनिंगकरिता निवडले असल्याने या जिल्ह्याचा विकास आता झपाट्याने होणार आहे. नारळ पिकाचे कार्यालयही लवकरच याठिकाणी आणणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.