शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशांना ‘रिव्हर्स गिअर’

By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST

रत्नागिरी : बँक खात्याचा नंबर चुकीचा दिल्याने फटका

रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदत आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप करण्यात आले आहे. मात्र, बँक खात्याचा नंबर चुकीचा असल्याच्या कारणावरून आतापर्यंत २५६ धनादेश परत आल्याने एकूण ४४,०६,२६५ रुपयांचे वाटप थांबले आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदारांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदतही देण्यात आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप सुरू आहे. मुळात रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून वाटपाला विलंब झाला होता. सुरूवातीचा मंजूर झालेला १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांचा निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड पडला होता. त्यानंतर सप्टेंबरपासून नुकसानभरपाई वाटपास गती आली आहे. जिल्ह्यात १०,७७५ खातेदार आहेत. त्यापैकी येथील तहसील कार्यालयाकडून एकूण ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६३३ खातेदारांची एकूण १,१२,४२,२४६ रुपयांची तसेच दुसऱ्या टप्प्यात ७२९ खातेदारांची १,१३,४५,०७६ एवढ्या रकमेची बिले बँकेकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र, या १३६२ खातेदारांपैकी ११०६ खातेदारांना एकूण १,८१,६३,३०१ रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, बँकखाते क्रमांक चुकीचा असल्याच्या कारणावरून २५६ खातेदारांचे धनादेश मागे आले आहेत. त्यामुळे या धनादेशापोटी ४४,०६,२६५ एवढे वाटप थांबले आहे.आता तिसऱ्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडून ६५५ खातेदारांचे एकूण १,०५,२१,८४३ रुपयांचे बिल बँकांकडे पाठवण्यात आले असून, त्याचे वाटप आता सुरू आहे. ज्यांचे धनादेश परत आले आहेत. त्यांचे खाते क्रमांक दुरूस्त करून ते पुन्हा त्यांच्या बँकांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.तालुक्यात एकूण १०,७७५ इतके खातेदार आहेत. आतापर्यंत जेमतेम १३६२ खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. वैयक्तिक खातेदारांच्या वाटपामध्ये कुठलीच अडचण नसली तरी सामूहिक खातेदारांना वाटप करण्यात अतिशय अडचणी येत आहेत. त्यामुळे वाटपास विलंब होत असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत २५६ धनादेश परतधनादेश परत आल्याने ४४ लाख ६ हजार २६५ रूपयांचे वाटप थांबले.सुरुवातीला निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड़तहसील कार्यालयाकडून ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढली.रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी आलेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते नंबर चुकीचा दिल्याने हा धनादेश परत येत आहे. त्यामुळे पुन्हा वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.