शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

धनादेशांना ‘रिव्हर्स गिअर’

By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST

रत्नागिरी : बँक खात्याचा नंबर चुकीचा दिल्याने फटका

रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदत आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप करण्यात आले आहे. मात्र, बँक खात्याचा नंबर चुकीचा असल्याच्या कारणावरून आतापर्यंत २५६ धनादेश परत आल्याने एकूण ४४,०६,२६५ रुपयांचे वाटप थांबले आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदारांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदतही देण्यात आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप सुरू आहे. मुळात रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून वाटपाला विलंब झाला होता. सुरूवातीचा मंजूर झालेला १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांचा निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड पडला होता. त्यानंतर सप्टेंबरपासून नुकसानभरपाई वाटपास गती आली आहे. जिल्ह्यात १०,७७५ खातेदार आहेत. त्यापैकी येथील तहसील कार्यालयाकडून एकूण ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६३३ खातेदारांची एकूण १,१२,४२,२४६ रुपयांची तसेच दुसऱ्या टप्प्यात ७२९ खातेदारांची १,१३,४५,०७६ एवढ्या रकमेची बिले बँकेकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र, या १३६२ खातेदारांपैकी ११०६ खातेदारांना एकूण १,८१,६३,३०१ रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, बँकखाते क्रमांक चुकीचा असल्याच्या कारणावरून २५६ खातेदारांचे धनादेश मागे आले आहेत. त्यामुळे या धनादेशापोटी ४४,०६,२६५ एवढे वाटप थांबले आहे.आता तिसऱ्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडून ६५५ खातेदारांचे एकूण १,०५,२१,८४३ रुपयांचे बिल बँकांकडे पाठवण्यात आले असून, त्याचे वाटप आता सुरू आहे. ज्यांचे धनादेश परत आले आहेत. त्यांचे खाते क्रमांक दुरूस्त करून ते पुन्हा त्यांच्या बँकांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.तालुक्यात एकूण १०,७७५ इतके खातेदार आहेत. आतापर्यंत जेमतेम १३६२ खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. वैयक्तिक खातेदारांच्या वाटपामध्ये कुठलीच अडचण नसली तरी सामूहिक खातेदारांना वाटप करण्यात अतिशय अडचणी येत आहेत. त्यामुळे वाटपास विलंब होत असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत २५६ धनादेश परतधनादेश परत आल्याने ४४ लाख ६ हजार २६५ रूपयांचे वाटप थांबले.सुरुवातीला निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड़तहसील कार्यालयाकडून ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढली.रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी आलेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते नंबर चुकीचा दिल्याने हा धनादेश परत येत आहे. त्यामुळे पुन्हा वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.