शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशांना ‘रिव्हर्स गिअर’

By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST

रत्नागिरी : बँक खात्याचा नंबर चुकीचा दिल्याने फटका

रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदत आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप करण्यात आले आहे. मात्र, बँक खात्याचा नंबर चुकीचा असल्याच्या कारणावरून आतापर्यंत २५६ धनादेश परत आल्याने एकूण ४४,०६,२६५ रुपयांचे वाटप थांबले आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदारांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदतही देण्यात आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप सुरू आहे. मुळात रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून वाटपाला विलंब झाला होता. सुरूवातीचा मंजूर झालेला १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांचा निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड पडला होता. त्यानंतर सप्टेंबरपासून नुकसानभरपाई वाटपास गती आली आहे. जिल्ह्यात १०,७७५ खातेदार आहेत. त्यापैकी येथील तहसील कार्यालयाकडून एकूण ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६३३ खातेदारांची एकूण १,१२,४२,२४६ रुपयांची तसेच दुसऱ्या टप्प्यात ७२९ खातेदारांची १,१३,४५,०७६ एवढ्या रकमेची बिले बँकेकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र, या १३६२ खातेदारांपैकी ११०६ खातेदारांना एकूण १,८१,६३,३०१ रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, बँकखाते क्रमांक चुकीचा असल्याच्या कारणावरून २५६ खातेदारांचे धनादेश मागे आले आहेत. त्यामुळे या धनादेशापोटी ४४,०६,२६५ एवढे वाटप थांबले आहे.आता तिसऱ्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडून ६५५ खातेदारांचे एकूण १,०५,२१,८४३ रुपयांचे बिल बँकांकडे पाठवण्यात आले असून, त्याचे वाटप आता सुरू आहे. ज्यांचे धनादेश परत आले आहेत. त्यांचे खाते क्रमांक दुरूस्त करून ते पुन्हा त्यांच्या बँकांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.तालुक्यात एकूण १०,७७५ इतके खातेदार आहेत. आतापर्यंत जेमतेम १३६२ खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. वैयक्तिक खातेदारांच्या वाटपामध्ये कुठलीच अडचण नसली तरी सामूहिक खातेदारांना वाटप करण्यात अतिशय अडचणी येत आहेत. त्यामुळे वाटपास विलंब होत असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत २५६ धनादेश परतधनादेश परत आल्याने ४४ लाख ६ हजार २६५ रूपयांचे वाटप थांबले.सुरुवातीला निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड़तहसील कार्यालयाकडून ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढली.रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी आलेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते नंबर चुकीचा दिल्याने हा धनादेश परत येत आहे. त्यामुळे पुन्हा वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.