शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आचरावासीय गावात परतले

By admin | Updated: December 10, 2014 23:51 IST

गाव भरण्याचा देवाचा कौल : तात्पुरते संसार झटक्यात आवरले

आचरा : आपल्या विविध रुढी, परंपरा संस्थानी थाटात जपणाऱ्या आचरा गावची गावपळण इनामदार श्री देव रामेश्वराने बुधवारी तीन रात्रींचा मुक्काम पार पडल्यानंतर गावात परतण्याकरीता कौल दिल्याने अत्यंत उत्साहात समाप्त झाली. श्री रामेश्वर मंदिरात गाव भरण्याचा तोफेचा इशारा होताच संपूर्ण गाव सहजीवनाचा अनोखा आनंद गाठीशी बांधत माघारी परतले.दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरीता यावर्षी कौल दिल्याने ७ ते १० डिसेंबर या कालावधीत ही गावपळण पार पडली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारी गावातील लोक या गावपळणीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. पारवाडी नदीकिनारी, भगवंतगड सीमांबा, आडबंदर, वायंगणी माळरानावर, चिंदर सडेवाडी आदी ठिकाणी आचरावासीयांनी झोपड्या उभारून आपले तात्पुरते नवे संसार थाटले होते. उत्तरोत्तर या गावपळणीची रंगत अधिकच वाढत गेली होती. आधुनिक काळातील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आचरावासीयांनी एकमेकांच्या सान्निध्यात कोणत्याही कामकाजाव्यतिरिक्त मोकळेपणाने घालविले होते. सध्याचे जीवनमान एवढे व्यस्त झालेले आहे की, शेजारी पाजारी कित्येक वर्षे एकमेकांना मनमोकळेपणाने भेटू शकत नाहीत. असे असताना गावपळण ही प्रथा आचरावासीयांना हवीहवीशी वाटते. आज गावी न परतण्याचा रामेश्वराचा कौल झाल्यास एक रात्रीचा मुक्काम वाढणार होता. परंतु या तीन रात्रींच्या मुक्कामानंतर रामेश्वराचा गाव भरण्याचा कौल झाल्याने आचरावासीय बुधवारी मिळेल त्या वाहनाने आपल्या मूळ घराकडे धाव घेऊ लागले. रामेश्वराने गाव भरण्याचा कौल दिल्याची वार्ता क्षणार्धात पसरताच सर्वांनी ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार एका झटक्यात आवरते घेतले.गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात वास्तव्य करून राहणाऱ्या आचरावासीयांना कित्येक वर्षांच्या अनुभवाप्रमाणे श्री रामेश्वरावर असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेमुळे कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही. जुन्या जाणत्या आचरावासीयांना याविषयी विचारणा केली असता, आचरा गावपळण श्री रामेश्वरावर असलेल्या श्रद्धेपोटी आम्ही करत आहोत. त्यांनी आमची संपूर्णत: जबाबदारी घेतली असल्याने इतक्या वर्षांच्या गावपळणीच्या इतिहासात कोणताच वाईट प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाव भरण्याचा कौल क्षणार्धात आचरावासीयांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी तत्काळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. गावपळणीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले आचरावासीय हळूहळू माघारी परतणार आहेत. गुरुवारी आचरा गावचे जीवनमान पूर्वपदावर येणार आहे. (वार्ताहर)आचरा गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांकरीता थाटलेला झोपडीतील संसार ग्रामस्थांनी गावात परतण्यासाठी आवरता घेतला. गावपळणीनिमित्त वेशीबाहेर राहिलेले आचरावासीय आता नव्या दमाने गावात परतले आहेत.पोलिसांचे सहकार्यआपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कारकिर्दीतील पहिलीवहिली गावपळण आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेंद्र शिंदे यांनी अत्यंत संयमाने व आपल्या अनोख्या कार्यशैलीने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत हाताळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकठिकाणी घडणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस मुख्यालयातून जादा फौजफाटा मागवत त्यांच्या सहकार्याने अत्यंत सुव्यवस्थित बंदोबस्त राखत गावपळण पार पाडण्याकरीता आचरावासीयांना मोलाचे सहकार्य केले. गावपळण कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडता आचरा भागाची संपूर्ण नाकाबंदी करत प्रत्येक वाडीत दोन जादा पोलीस कर्मचारी तैनात ठेवले होते.