शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल झोनला विरोध करण्याचा ठराव

By admin | Updated: October 1, 2015 22:35 IST

जिल्हा परिषद : तीन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा केमिकल झोन नको, केमिकल झोनला विरोध करण्यात येईल, असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी ठराव मंजूर करुन तो ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज तिसऱ्या दिवशी अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी तीन दिवस चाललेल्या सभेतून प्रशासनाने बोध घ्यावा, असा सल्ला देत सभा संपल्याचे जाहीर केले. गेले तीन दिवस चाललेल्या या सभेत विषय पत्रिकेवर १५ विषय आणि आयत्या वेळचे अधिकाऱ्यांचे १७ विषय, याबद्दल सदस्य उदय बने यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच आयत्या वेळच्या विषयांमध्ये पदवीधर शिक्षकांना बी. एड. परवानगीचा विषय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषद शाळांना पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांना बी. एड. करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उदय बने, विलास चाळके यांनी केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बी. एड. हा दोन वर्षांचा कोर्स असल्याने त्यासाठी शिक्षकांना परवानगी देणे परवडणारे नाही. आयुक्तांनीही शिक्षकांना बी. एड. परवानगी देऊ नये, अशी सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी स्पष्ट केले. परवागनीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी बने यांनी पदवीधर आवश्यक असल्याने त्यांना बी. एड. साठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरून आज तिसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली. यामध्ये अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले होते. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमावरून सदस्य भगवान घाडगे यांनी निधी असतानाही कामाचा आराखडाच तयार नसल्याने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभाग असतानाही पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेण्यात आलेली नसल्याने आणखी किती दिवस जाणार आहेत, असा प्रश्न उपस्थित घाडगे यांनी उपस्थित केला. महावितरणकडून पानवल येथे रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर विद्युत पोल उभारले आहेत. त्याची तत्काळ पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. रस्त्यांच्या कडेला अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतानाही शासनाकडून येथे केमिकल झोन म्हणून करण्याचा घाट घातला जात आहे. त्याला सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. जिल्ह्यात केमिकल झोन नको, असा महत्त्वपूर्ण ठराव सर्वपंक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला. हा ठराव शासनाला तत्काळ पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच शासनाकडे पर्यटन विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी सभेत केली. सभेला उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, सदस्य भगवान घाडगे, विश्वास सुर्वे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक, अन्य सदस्य व अधिकारीवर्ग उपस्थित होता. (शहर वार्ताहर)