शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पर्ससीनधारक करणार ‘करो या मरो’ आंदोलन

By admin | Updated: February 11, 2016 23:57 IST

पंधरा दिवसात निर्णय घ्या...: पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी केला असून, अधिसूचनेबाबत १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास करो या मरो भूमिका घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मिरकरवाडा येथे मच्छिमारांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मच्छिमार नेते सुलेमान मुल्ला, जहुर दर्वे, माजी नगरसेवक शरीफ दर्वे, नगरसेवक नुरुद्दीन पटेल, शब्बीर राजपूरकर, शौकत दर्वे, सिराज वाडकर, नजीर सरदार, बाबामियॉ मजगावकर, मकसूद हुना, असगर बांगी, रियाज मस्तान, सलाऊद्दिन हातवडकर, शहादत हबीब, सिकंदर हाजू आदी मिरकरवाडा, साखरीनाटे व अन्य गावातील पर्ससीन नेटधारक मच्छिमार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने एकतर्फी अधिसूचना काढली असून, पर्ससीन नेटधारक मच्छिमारांना दुर्लक्षित केले. त्यामुळे एक कुटुंबाला जगविण्यासाठी दुसऱ्या कुटुंबाचा बळी घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी उपस्थित केला. जिल्ह्यात १० टक्क्यांपेक्षा कमी पारंपरिक मच्छिमार आहेत. त्यामध्ये रापणकार हे मालवण आणि रत्नागिरीतील मिऱ्या भागात आहेत. त्यामुळे ९० टक्के पर्ससीन नेटधारक मच्छिमारांवर शासनाकडून अन्याय करण्यात आल्याचे मच्छिमारांनी सांगितले. पर्ससीन नेटधारक मच्छिमारांसाठी मासेमारीचा कालावधी डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे, ही अट शिथिल करावी. तसेच त्यांना मे महिन्यापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी यावेळी मच्छिमारांनी केली. पावसाळ्यानंतर दोन महिने खोल समुद्रातील मासेमारीसाठी वातावरण खराब असते. त्यामुळे पुढील दोन महिन्यात मासेमारी काय करणार व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार, असा प्रश्न उपस्थित करुन एप्रिल व मे महिन्यामध्ये मासेमारी बंद केली, तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली. त्यामुळे ही अट शिथिल केली नाही, तर मच्छिमारांना आत्महत्या करावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत विचार करावा, अन्यथा करो या मरो, भूमिका घेऊन आंदोलन उभारून मोर्चा काढणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. सोमवंशी समितीच्या अहवालावरून एका बाजूने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो चुकीचा असून, त्यासाठी आणखी एक समिती नेमून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. (शहर वार्ताहर)