शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

नगरपंचायतीसाठी प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: August 2, 2015 20:41 IST

दोडामार्गकडे सर्वांचे लक्ष : पहिल्याच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस वेग

वैभव साळकर - दोडामार्ग  -तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच होणाऱ्या कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. तर भाजप तूर्तास सावधगिरीने घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडी करण्याच्या सकारात्मकतेत आहेत. दरम्यान, नगरपंचायत झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेना-भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तत्कालीन काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तालुका ठिकाणची ग्रामपंचायत नगर पंचायतीत रुपांतरीत करण्याचा अध्यादेश निघाला होता. त्याची अंमलबजावणी सेना-भाजपा युतीच्या काळात होत असून, त्या अनुषंगानेच कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे. पूर्वी ११ सदस्यसंख्या होती. नगरपंचायत झाल्याने ही संख्या १७ वर पोहोचली आहे. शिवाय वॉर्ड रचनादेखील बदलणार असून, प्रत्येकी एका वॉर्डमधून एकच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे १७ वॉर्डमध्ये १७ उमेदवार शोधण्याचे काम राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नगरपंचायतीची निवडूक असल्याने तालुक्यातील सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे. नगर पंचायतीच्या या लगीनघाईत शिवसेना सगळ्यात पुढे असून, नुकत्याच पार पडलेल्या सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याची धुरा उपतालुकाध्यक्ष गोविंद महाले, शहराध्यक्ष शाणी बोर्डेकर, शाम खडपकर, विनायक मणेरीकर व जीवन सावंत यांच्यावर राहणार आहे. आपल्या मित्रपक्षाने जाहीर केलेल्या स्वबळाच्या भूमिकेवर एरव्ही गळ्यात गळा घालून राज्यात वावरणाऱ्या भाजपाने मात्र आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या भाजपाची नेतेमंडळी सावध भूमिकेत असून, इतर राजकीय पक्षांच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. याठिकाणी सेनेपेक्षा भाजपाचे पारडे जड दिसत असून शहराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यावर निवडणुकीत मोठी धुरा असणार आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आणि तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांच्या कल्पक नेतृत्वामुळे भाजप निवडणुकीत चांगलीच रंगत आणू शकेल. शिवाय कें द्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्याचा फायदा सत्ताधारी म्हणून भाजपाला काही प्रमाणात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर गळ्यात-गळा घालून असून निवडणुकीत आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहे. तशा वाटाघाटीदेखील पडद्यामागून सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला ही निवडणूक म्हणावी तशी कठीण जाणार नाही. शिवाय गेली अडीच वर्षे ग्रामपंचायतीची ही सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसचे युवा सरपंच म्हणून संतोष नानचे यांनी कसई दोडामार्ग शहरात चांगलीच छाप पाडली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आदी विविध क्षेत्रात लाखो रुपयांची विकासकामे शहरासाठी आणून कसई दोडामार्गवासीयांना अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना गेल्या अडीच वर्षात झालेल्या लाखो रुपयांच्या विकासकामांचा फायदा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी देखील राजकारणात सक्रीय झाले आहेत. दळवींना मानणारा जुनाजाणता वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ काँग्रेसला अधिक बळकटी आणणारी ठरेल. एकंदरीत नगरपंचायतीची ही तालुक्यातील पहिलीच निवडणूक असल्याने रणनीती आखताना राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची धावपळ उडणार असून, ही निवडणूक प्रत्येकाचे अस्तित्व दाखवून ठेवणारी ठरणार आहे.उमेदवार शोधताना...कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने वार्ड रचनाही बदलण्यात आली आहे. पूर्वी चार वार्डात होणारी ग्रामपंचायत निवडणूक आता नगर पंचायतीनंतर १७ वार्डात होणार आहे. या १७ वार्डात १७ उमेदवार आरक्षणानुसार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे. शिवाय ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने १७ मधील किमान आठ सदस्य या महिला उमदेवार असणार आहेत. त्यामुळे महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे.