शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार

By admin | Updated: April 5, 2016 00:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मंडल अधिकारीही आॅनलाईन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालये आॅनलाईन होत असून नागरीकांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यांना शासनाकडून मंजूरी मिळाली असून प्रथम हे तीन तालुके आॅनलाईन होत असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी दालनात झाला. यावेळी माहिती देताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. महसूल यंत्रणेतील मंडल अधिकारी कार्यालये आता आॅनलाईन होणार आहेत. सर्व तालुक्यांच्या ‘सिडीज’ तयार करण्याचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे शासन निर्देश होते. त्यानुसार सर्व तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले आहे. या सर्व सिडीज शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला हे तीन तालुके प्राधान्यक्रमाने घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आता नागरिकांच्या या दस्तऐवजाच्या नोंंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. नोंदी प्रलंबित राहणार नाहीत. आपल्या जिल्ह्यात १८ लाख सात-बारा धारक आहेत. आता तहसीलदार आणि भूमिअभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंगही सुरू असून हे कामही ४० टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ६९ पदांच्या भरती प्रक्रियेची यादी प्रसिध्द होऊन त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. याबाबत तक्रारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याचा अहवाल नुकताच शासनाकडे पाठविण्यात आला असून शासनाकडून आदेश प्राप्त होताच रखडलेली सर्व नियुक्ती पत्रे उमेदवारांना देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीपोटी प्राप्त ३७ कोटी निधीपैकी ३५ कोटी ४३ लाखांचे वाटप झाले आहे. त्याची आकडेवारी ९६ टक्के आहे. अखर्चित राहिलेले १ कोटी ५७ लाख रूपये शासनास पाठविण्यात आले असून हा निधी यावर्षी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. लोकसंख्या नोंद करण्याचा कार्यक्रम ९५ टक्के पूर्ण झाला आहे. त्यामध्ये आधारकार्डच्या नोंदी असल्याने त्याही पूर्ण झाल्या आहेत. ते कामही १०० टक्के पूर्ण होईल तसेच वैभववाडी तालुक्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाच्या यु. एन. डी. पी. प्रकल्पांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा व्याघ्रेश्वर येथे देशातील दुसरा क्रॅब हॅचरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशात केवळ तामिळनाडूमध्ये असा प्रकल्प आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च आहे. केंद्र शासनाचे विशेष सचिव सुशिलकुमार यांनी नुकतीच २०१२ पासून सुरू असलेल्या यु. एन. डी. पी. प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गात क्रॅब हॅचरी (खेकडे पालन) प्रकल्प सुरू करणार असल्याचे सागितले. छोटी मासळी जाळ्यातून निसटण्यासाठी गोलाकार जाळे विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही मासळी जाळ्यात अडकण्यापासून वाचते. त्यामुळे दुष्काळाचा संभवणारा धोका टळू शकतो. हा चांगला उपक्रम असल्याने जिल्हा नियोजन मधून १९ लाख रूपये देण्यात आले. अशा प्रकारे ३१७ मच्छिमारांना या जाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)