शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

रिमझिम पावसाने बागायतदार धास्तावले

By admin | Updated: February 28, 2015 23:28 IST

कणकवली, देवगडसह कुडाळ भागात शिडकावा

पुरळ : वारंवार समस्येच्या गर्तेत असलेल्या आंबा बागायतदारांसमोर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचे संकट आले असल्याने आंब्यावर अनेक रोग फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. कणकवली, कुडाळ, देवगड परिसरात शनिवारी सकाळी काळे ढग भरून आले आणि काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. बुरशीचे संकटही उभे ठाकले असून, आंबा पिकाला अनेक रोगांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती माहिती घेऊन आंबा फवारणी हाताळली पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. तीन टप्प्यांत येणारा मोहोर यावर्षी पाच टप्प्यांत येऊन वारंवार फूट झाल्याने सुरुवातीच्या आंब्यांची गळ होत राहिली. याचा फटका बऱ्याचशा प्रमाणात आंबा बागायतदारांना बसला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता थ्रीप्स, तुडतुडे व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. युरोपीय राष्ट्रांनी आंब्यावरील बंदी उठविल्यामुळे आंब्याला मागणी वाढणार आहे. यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार समाधानी होता. मात्र, बागायतदारांच्या समाधानावर अवेळी पडणाऱ्या पावसाने विरजण टाकले आहे. फळधारणा झालेल्या आंब्यांवर डाग पडण्याची शक्यता आहे. मोहोर असलेल्या कलमांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकते. हा मोहोर पावसाच्या पाण्याने काळा पडून त्याठिकाणी फळधारणा होत नाही. यावर्षी बऱ्याच प्रमाणात कीटकनाशकांच्या अतिरिक्त फवारण्या करण्यात आल्या. त्यामुळे आंबा मोहोरावर फळधारणा होण्यासाठी होणारे परागीकरण झाले नसल्याने शेवटच्या टप्प्यातील आलेल्या मोहोराला फळधारणा झाली नाही. यामुळे कृषी सल्ल्यानुसार बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविण्यासाठी बागायतदारांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. रिमझिम पाऊस पडत राहिला तर आंबा पीक यावर्षी संपुष्टात येण्याची भीती आहे, तर पावसाबरोबर वारा सुटल्यास फळधारण झालेल्या आंब्याची गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानीही होऊ शकते. या शक्यतांनी आंबा बागायतदार सध्या चिंतातुर झाले आहेत. (वार्ताहर)