शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

रिमझिम पावसाने बागायतदार धास्तावले

By admin | Updated: February 28, 2015 23:28 IST

कणकवली, देवगडसह कुडाळ भागात शिडकावा

पुरळ : वारंवार समस्येच्या गर्तेत असलेल्या आंबा बागायतदारांसमोर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचे संकट आले असल्याने आंब्यावर अनेक रोग फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. कणकवली, कुडाळ, देवगड परिसरात शनिवारी सकाळी काळे ढग भरून आले आणि काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. बुरशीचे संकटही उभे ठाकले असून, आंबा पिकाला अनेक रोगांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती माहिती घेऊन आंबा फवारणी हाताळली पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. तीन टप्प्यांत येणारा मोहोर यावर्षी पाच टप्प्यांत येऊन वारंवार फूट झाल्याने सुरुवातीच्या आंब्यांची गळ होत राहिली. याचा फटका बऱ्याचशा प्रमाणात आंबा बागायतदारांना बसला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता थ्रीप्स, तुडतुडे व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. युरोपीय राष्ट्रांनी आंब्यावरील बंदी उठविल्यामुळे आंब्याला मागणी वाढणार आहे. यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार समाधानी होता. मात्र, बागायतदारांच्या समाधानावर अवेळी पडणाऱ्या पावसाने विरजण टाकले आहे. फळधारणा झालेल्या आंब्यांवर डाग पडण्याची शक्यता आहे. मोहोर असलेल्या कलमांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकते. हा मोहोर पावसाच्या पाण्याने काळा पडून त्याठिकाणी फळधारणा होत नाही. यावर्षी बऱ्याच प्रमाणात कीटकनाशकांच्या अतिरिक्त फवारण्या करण्यात आल्या. त्यामुळे आंबा मोहोरावर फळधारणा होण्यासाठी होणारे परागीकरण झाले नसल्याने शेवटच्या टप्प्यातील आलेल्या मोहोराला फळधारणा झाली नाही. यामुळे कृषी सल्ल्यानुसार बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविण्यासाठी बागायतदारांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. रिमझिम पाऊस पडत राहिला तर आंबा पीक यावर्षी संपुष्टात येण्याची भीती आहे, तर पावसाबरोबर वारा सुटल्यास फळधारण झालेल्या आंब्याची गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानीही होऊ शकते. या शक्यतांनी आंबा बागायतदार सध्या चिंतातुर झाले आहेत. (वार्ताहर)