शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

लिलावामुळे जुन्या गाड्यांतील पार्टस्चा पुनर्वापर

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : एका गाडीचे मिळतात सुमारे दोन लाख रुपये

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -‘एस. टी.’चे आयुर्मान दहा वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कोणतीही गाडी भंगारात काढण्यापूर्वी तिचे करण्यात आलेले रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. भंगारात विकलेली गाडीसुध्दा जशीच्या तशी कधीच वापरात आणली जात नाही. गाडीतील चांगल्या पार्ट्सचा पुनर्वापर केला जातो. साधारणत: एका गाडीचे दोन लाख रूपये मिळतात.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एस. टी.च्या गाड्या निर्लेखित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. महामंडळाच्या एकूण ३१ विभागांमध्ये निर्लेखन प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालयाकडून निश्चित केला जातो. वर्षातून एकदा लिलाव प्रक्रिया होते. मध्यवर्ती कार्यालयाकडून निर्लेखित करण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या मागवण्यात येते. लिलावाची तारीख निश्चित झाल्यानंतर संबंधित गाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. त्यानंतर गाडीतील चांगले पार्ट्स बाजूला काढले जातात.लिलाव प्रक्रिया ई-प्रणालीव्दारे होत असली तरीही प्रक्रिया राबवण्यासाठी महामंडळाकडून एका संस्थेला नियुक्त केले जाते. त्या संस्थेकडून लिलाव जाहीर झाल्यानंतर ठेकेदार आपापला माणूस पाठवून लिलावातील गाड्या पाहून आकडे नमूद करतात. प्रत्येक विभागाकडून लिलावातून किती रूपये मिळतील, यांचा अंदाज केलेला असतो, त्यानुसार अधिक पैसे देणाऱ्याला गाड्या विकल्या जातात. लिलाव प्रक्रिया विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते. गाड्या भंगारात काढल्या जातात, त्यावेळी एस. टी.च्या ताफ्यातील कमी झालेल्या गाड्यांची संख्या भरून काढण्यासाठी नवीन गाड्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पुरविल्या जातात. महामंडळ दरवर्षी नवीन गाड्यांची मागणी नोंदवते, त्यानंतर त्या गाड्यांची बांधणी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये केली जाते. गाड्या बांधणीनंतर त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतात. एखादी गाडी भंगारात काढण्यात आली असेल, परंतु गाडी वापरण्यास योग्य असेल तर संबंधित गाडीचा वापर करण्यात येतो. गाडीचे आयुर्मान शिल्लक असताना मोठा अपघात घडला व त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले असेल तर मात्र ती गाडी भंगारात काढली जाते. अन्यथा गाडीचे नूतनीकरण करून गाडी वापरात आणली जाते. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी ठरलेली एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद असलेल्या एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांची सुरक्षितता जपली जाते. ५६ ते ६० प्रवासी घेऊन प्रवास करीत असताना अपघात होऊ नये, याची काळजी घेतली जाते. प्रवाशांना गाडीत घेण्यापूर्वीच चालक तपासणी करूनच गाडी ताब्यात घेतो. म्हणूनच एस. टी.ला विशिष्ट आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे.