शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लिलावामुळे जुन्या गाड्यांतील पार्टस्चा पुनर्वापर

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : एका गाडीचे मिळतात सुमारे दोन लाख रुपये

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -‘एस. टी.’चे आयुर्मान दहा वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कोणतीही गाडी भंगारात काढण्यापूर्वी तिचे करण्यात आलेले रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. भंगारात विकलेली गाडीसुध्दा जशीच्या तशी कधीच वापरात आणली जात नाही. गाडीतील चांगल्या पार्ट्सचा पुनर्वापर केला जातो. साधारणत: एका गाडीचे दोन लाख रूपये मिळतात.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एस. टी.च्या गाड्या निर्लेखित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. महामंडळाच्या एकूण ३१ विभागांमध्ये निर्लेखन प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालयाकडून निश्चित केला जातो. वर्षातून एकदा लिलाव प्रक्रिया होते. मध्यवर्ती कार्यालयाकडून निर्लेखित करण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या मागवण्यात येते. लिलावाची तारीख निश्चित झाल्यानंतर संबंधित गाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. त्यानंतर गाडीतील चांगले पार्ट्स बाजूला काढले जातात.लिलाव प्रक्रिया ई-प्रणालीव्दारे होत असली तरीही प्रक्रिया राबवण्यासाठी महामंडळाकडून एका संस्थेला नियुक्त केले जाते. त्या संस्थेकडून लिलाव जाहीर झाल्यानंतर ठेकेदार आपापला माणूस पाठवून लिलावातील गाड्या पाहून आकडे नमूद करतात. प्रत्येक विभागाकडून लिलावातून किती रूपये मिळतील, यांचा अंदाज केलेला असतो, त्यानुसार अधिक पैसे देणाऱ्याला गाड्या विकल्या जातात. लिलाव प्रक्रिया विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते. गाड्या भंगारात काढल्या जातात, त्यावेळी एस. टी.च्या ताफ्यातील कमी झालेल्या गाड्यांची संख्या भरून काढण्यासाठी नवीन गाड्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पुरविल्या जातात. महामंडळ दरवर्षी नवीन गाड्यांची मागणी नोंदवते, त्यानंतर त्या गाड्यांची बांधणी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये केली जाते. गाड्या बांधणीनंतर त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतात. एखादी गाडी भंगारात काढण्यात आली असेल, परंतु गाडी वापरण्यास योग्य असेल तर संबंधित गाडीचा वापर करण्यात येतो. गाडीचे आयुर्मान शिल्लक असताना मोठा अपघात घडला व त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले असेल तर मात्र ती गाडी भंगारात काढली जाते. अन्यथा गाडीचे नूतनीकरण करून गाडी वापरात आणली जाते. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी ठरलेली एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद असलेल्या एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांची सुरक्षितता जपली जाते. ५६ ते ६० प्रवासी घेऊन प्रवास करीत असताना अपघात होऊ नये, याची काळजी घेतली जाते. प्रवाशांना गाडीत घेण्यापूर्वीच चालक तपासणी करूनच गाडी ताब्यात घेतो. म्हणूनच एस. टी.ला विशिष्ट आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे.