शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

थेट मुलाखतीतून भरती

By admin | Updated: May 15, 2016 00:13 IST

आरोग्यमंत्र्यांची माहिती : दीपक सावंत यांची देवगड रूग्णालयाला भेट

देवगड : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त १४ जिल्हयाप्रमाणेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे थेट मुलाखतीद्वारे कायमस्वरूपी नियुक्त केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये आले असता दिली.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे खासगी दौऱ्यावर देवगड येथे आले असून अचानक त्यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितिन बिलोलीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके, डॉ. नलावडे आदी उपस्थित होते. तसेच देवगड उप जिल्हा रूग्णालयासाठी २२ कोटी ६३ लाख रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आर्थिक तरतूद उपलब्ध होताच या उपजिल्हा रूग्णालयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जागेचीही पाहणी आरोग्यमंत्री सावंत यांनी केली. देवगड ग्रामीण रूग्णालयाला दुरूस्ती व नूतनीकरणासाठी १६ लाख रूपये वर्षभरात निधी उपलब्ध केला आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून राज्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून जनतेची सेवा केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाऊन एकही पद रिक्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेंगुर्ले येथील नवीन उपजिल्हा रूग्णालयासाठी ६ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.या भेटीदरम्यान, त्यांनी देवगड रूग्णालयातील विविध समस्या आणि सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. आरोग्यमंत्र्यांच्या हा खासगी दौरा असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती. (प्रतिनिधी)अचानक दौरा सेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती४सिंंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हेही जिल्हे अतिदुर्गम भागात असल्याने या तिन्ही जिल्ह्यातील डॉक्टरांची पदे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांप्रमाणे थेट मुलाखतीद्वारे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही अस्थायी स्वरूपाची भरली जात होती. तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ४आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या अचानक आलेल्या देवगड दौऱ्यात तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तसेच चुकीच्या इंजेक्शनमुळे संदीप कावले यांना आपले प्राण गमवावे लागले होते. याची अद्याप दखलही आरोग्यमंत्र्यांनी घेतली नसल्याचे बोलले जात आहे.