शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

नुकसानाचे पुनर्पंचनामे

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

आंबा, काजू नुकसान : अद्याप शेतकरी भरपाईपासून वंचित

चिपळूण : फेब्रुवारी व मार्च २०१५मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश वाटप करताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन, ज्या खातेदारांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्पंचनामे करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. ज्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अथवा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते प्रत्यक्ष वहिवाट करत असल्याची खात्री होण्यासाठी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत या काळात वस्तुस्थितीदर्शक पंचनामे सुरु आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच व वहिवाटदार यांच्या उपस्थितीत हे पंचनामे करुन यादी तयार केली जाणार आहे. दि. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या यादीचे वाचन होईल. दि. १६ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंतच्या यादीवरुन प्रत्येक गावच्या मंडल अधिकारी कार्यालयात हरकती घेतल्या जातील. दि. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मंडल अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने प्राप्त हरकतींवर सुनावणी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. दि. ९ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी तयार केली जाणार असून, ही यादी तहसीलदार कार्यालयात जमा केली जाईल. याबाबतचे पत्र सर्व ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक यांना तहसीलदार कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूचे नुकसान झाल्याने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, ही भरपाई देताना शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती नसणे, आधार कार्ड नसणे, बँक खात्याचे नंबर चुकीचे देणे, एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असणे यामुळे शेतकरी नुकसानापासून वंचित असल्याचे दिसून आले. नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेकजण नुकसानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नव्याने पुनर्पंचनामे करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)पारदर्शक पंचनामे : वाटपात अडचणीनुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे नुकसान वाटपात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानाचे पुनर्पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पारदर्शकपणे हे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.