शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नुकसानाचे पुनर्पंचनामे

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

आंबा, काजू नुकसान : अद्याप शेतकरी भरपाईपासून वंचित

चिपळूण : फेब्रुवारी व मार्च २०१५मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश वाटप करताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन, ज्या खातेदारांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्पंचनामे करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. ज्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अथवा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते प्रत्यक्ष वहिवाट करत असल्याची खात्री होण्यासाठी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत या काळात वस्तुस्थितीदर्शक पंचनामे सुरु आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच व वहिवाटदार यांच्या उपस्थितीत हे पंचनामे करुन यादी तयार केली जाणार आहे. दि. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या यादीचे वाचन होईल. दि. १६ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंतच्या यादीवरुन प्रत्येक गावच्या मंडल अधिकारी कार्यालयात हरकती घेतल्या जातील. दि. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मंडल अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने प्राप्त हरकतींवर सुनावणी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. दि. ९ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी तयार केली जाणार असून, ही यादी तहसीलदार कार्यालयात जमा केली जाईल. याबाबतचे पत्र सर्व ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक यांना तहसीलदार कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूचे नुकसान झाल्याने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, ही भरपाई देताना शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती नसणे, आधार कार्ड नसणे, बँक खात्याचे नंबर चुकीचे देणे, एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असणे यामुळे शेतकरी नुकसानापासून वंचित असल्याचे दिसून आले. नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेकजण नुकसानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नव्याने पुनर्पंचनामे करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)पारदर्शक पंचनामे : वाटपात अडचणीनुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे नुकसान वाटपात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानाचे पुनर्पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पारदर्शकपणे हे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.