शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीस मान्यता द्या; मगच बदल्या करा

By admin | Updated: July 5, 2017 23:01 IST

शिक्षक भरतीस मान्यता द्या; मगच बदल्या करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे ५०० पदे रिक्त आहेत. शासनाकडूनही शिक्षक भरतीला हिरवा कंदील मिळालेला नाही. एकीकडे रिक्त जागा असतानाही सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून शिक्षकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असून, जोपर्यंत शासन शिक्षक भरतीस मान्यता देत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करू नयेत, असा एकमुखी ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या ठरावामुळे आंतरजिल्हा बदलीस पात्र असणारे तब्बल ३३१ शिक्षक अडचणीत सापडले आहेत.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती प्रितेश राऊळ, सायली सावंत, संतोष साटविलकर, शारदा कांबळे, सदस्य सतीश सावंत, राजेंद्र म्हापसेकर, प्रदीप नारकर, अनिषा दळवी, संजय पडते, नागेंद्र परब, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीपासून ते शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्य प्रदीप नारकर, सतीश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ५०० एवढी शिक्षकांची रिक्त पदे आहेत. शासनाने शिक्षक भरतीस स्थगिती दिल्याने ही पदे भरता येत नाहीत. त्यातच तब्बल ३३१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जाणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ८३१ च्या घरात जाणार आहे. असे असल्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस आमचा विरोध असल्याचे मत सदस्यांनी नोंदविले. तसा ठरावही घेण्यात आला.दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामाची कामे, रस्त्याची कामे एकाच ठेकेदाराला दिली जात असल्याचा आरोप सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी करत ही पंचवार्षिक योजना आहे का? असा खडा सवाल उपस्थित केला. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेले रस्ते निकृष्ट पद्धतीचे आहेत. या रस्त्यावर तब्बल १० कोटी रुपये खर्च करून हे रस्ते खराब झालेले आहेत. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी म्हापसेकर यांनी केली. या प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले.अवघड व सर्वसाधारण शाळांची यादी चुकीचीशासनाने जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरविण्यासाठी शिक्षण विभागाला जिल्ह्यात अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात मोडणाऱ्या शाळांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने तशी कार्यवाहीदेखील सुरू केली. मात्र, यादी तयार करताना ती चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला ह