शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रेडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:12 IST

दीपक केसरकर : रेडी ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सव साजरा

रेडी : औद्योगिकरण करताना पर्यावरणाचे रक्षण व स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यटनात्मक विकास केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रेडी येथे केले. रेडी ग्रामपंचायतीने ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रेडी ग्रामपंचायतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून रेडी ग्रामपंचायतीने स्थापनेपासून आतापर्यंत ज्यांनी सरपंच, उपसरपंच तसेच उपसरपंच पद भूषविले व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेडी गावच्या विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिले, अशा सर्वांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, दत्तगुरू वझे, एस. फ्रान्सिस, सरपंच सुरेखा कांबळी, दीपक राणे, डॉ. विवेक रेडकर, प्रल्हाद इंगळे, अजित सावंत, अश्विनी सातोसकर, राजन गावडे, प्रकाश परब, परशुराम राऊत, गौरेश कांबळी, चक्रपाणी गवंडी, ज्योती गोसावी, नंदिनी मांजरेकर, स्वप्नील नाईक, श्रध्दा राणे, राजेंद्र राणे, श्रृतिका साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, रेडी बंदर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर करण्याचा आपला मानस असून रेडी येथील यशवंतगड किल्ल्याची झालेली पडझडीचीही दुरूस्ती करण्यात येईल. हा किल्ला आंतरराष्ट्रीय नकाशावर येण्यासाठी येथील जमीनदारांनी जमीन देऊन सहकार्य केल्यास किल्ला दुरूस्तीसाठी कोकण पर्यटन निधीतून १० कोटी रूपये निधी उपलब्ध होईल. सांस्कृतिक सभागृहासाठी २० लाख, नळपाणी साठवण टाकीसाठी पाच लाखांचा निधी देण्याचेही आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मासेमारी, प्रदूषणविरहीत उद्योगधंदे, पेट्रोलियम प्रकल्प, काथ्या व्यवसाय हे उद्योग लोकांना विश्वासात घेऊन भविष्यात आणले जातील, असेही केसरकरांनी आश्वासन दिले.दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन रेडी हायस्कूल इमारतीसाठी खासदार निधीतून १० लाख रूपये मंजूर केल्याची माहिती दिली. यावेळी राजन तेली, संदेश पारकर, दत्तगुरू वझे, डॉ. विवेक रेडकर, अजित सावंत, सचिन राणे, प. म. राऊत, सुरेखा कांबळी, रावजी राणे, राजेंद्र कांबळी, लवराज कांबळी, गीतांजली कांबळी यांनी मनोगत व्यक्त करून अमृत महोत्सवास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सुरेखा कांबळी, सूत्रसंचालन नागेश नेमळेकर, आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)