शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

पुन्हा दुर्गंधीयुक्त जैविक कचरा

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विर्डी-तळेखोल परिसरातील प्रकार : गोवा व्यावसायिकांवरच संशय, ग्रामस्थांतून तीव्र संताप

वैभव साळकर - दोडामार्ग  -महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी-तळेखोल रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात अज्ञांताकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा नजीकच्या गोवा राज्यातून आणून टाकला जात असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. गोव्यातील काही व्यावसायिकांना यापूर्वीही अशाच प्रकारे कचरा टाकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पुन्हा असे न करण्याबाबत समज दिली होती; पण वर्षभरानंतर पुन्हा कचरा टाकण्यासाठी गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांतूून संताप व्यक्तहोत आहे.दोडामार्ग तालुका गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर वसला आहे. याच तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेखोल-विर्डी गावचा गोव्यातील काही व्यावसायिकांकडून कचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. ही दोन्ही गावे गोवा राज्याच्या सीमेला लागूनच हाकेच्या अंतरावर असल्याने गोव्यातील कचरा अज्ञातांकडून आणून टाकण्याचे काम केले जात आहे. कचऱ्यात टाकाऊ जैविक वस्तूंचा जास्त समावेश आहे. त्यात सुया, इंजेक्शन्स तसेच काचेच्या बाटल्या व झोपण्याच्या गादीत वापरल्या जाणाऱ्या लगद्याचा समावेश आहे. शिवाय सिमेंटच्या पिशव्यांमध्ये जनावरांच्या शरीरावरील टाकाऊ मांस भरून त्या टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा गोव्यातूनच आल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.यापूर्वीही रात्रीच्या वेळी कचरा टाकताना ग्रामस्थांनी गोव्यातील काही व्यावसायिकांना रंगेहात पकडले होते. त्यावेळी त्यांना यापुढे कचरा न टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर कचरा टाकणे बंद होते; परंतु पुन्हा गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा कचऱ्यासाठी डंपिंंग ग्राऊंड म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे विर्डी-तळेखोल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्र्रशासनाची तारांबळ सुरू असल्याने बहुतांशी अधिकारी यामध्येच व्यस्त झाले आहेत; पण याचाच गैरफायदा घेत हा दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या प्रकारामुळे येथे नव्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.ग्रामस्थ ठेवणार पाळतगतवर्षी अशाच प्रकारे दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याच्या प्रकाराला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून संबंधित व्यावसायिकांना पुन्हा असे कृत्य न करण्यासाठी समज दिली होती.त्यानंतर हा प्रकार बंद झाला होता; पण पुन्हा येथे कचरा टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थ कचरा टाकणाऱ्यांवर आता पाळत ठेवणार असून रंगेहात पकडल्यानंतर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.