शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पुन्हा दुर्गंधीयुक्त जैविक कचरा

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विर्डी-तळेखोल परिसरातील प्रकार : गोवा व्यावसायिकांवरच संशय, ग्रामस्थांतून तीव्र संताप

वैभव साळकर - दोडामार्ग  -महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी-तळेखोल रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात अज्ञांताकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा नजीकच्या गोवा राज्यातून आणून टाकला जात असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. गोव्यातील काही व्यावसायिकांना यापूर्वीही अशाच प्रकारे कचरा टाकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पुन्हा असे न करण्याबाबत समज दिली होती; पण वर्षभरानंतर पुन्हा कचरा टाकण्यासाठी गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांतूून संताप व्यक्तहोत आहे.दोडामार्ग तालुका गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर वसला आहे. याच तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेखोल-विर्डी गावचा गोव्यातील काही व्यावसायिकांकडून कचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. ही दोन्ही गावे गोवा राज्याच्या सीमेला लागूनच हाकेच्या अंतरावर असल्याने गोव्यातील कचरा अज्ञातांकडून आणून टाकण्याचे काम केले जात आहे. कचऱ्यात टाकाऊ जैविक वस्तूंचा जास्त समावेश आहे. त्यात सुया, इंजेक्शन्स तसेच काचेच्या बाटल्या व झोपण्याच्या गादीत वापरल्या जाणाऱ्या लगद्याचा समावेश आहे. शिवाय सिमेंटच्या पिशव्यांमध्ये जनावरांच्या शरीरावरील टाकाऊ मांस भरून त्या टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा गोव्यातूनच आल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.यापूर्वीही रात्रीच्या वेळी कचरा टाकताना ग्रामस्थांनी गोव्यातील काही व्यावसायिकांना रंगेहात पकडले होते. त्यावेळी त्यांना यापुढे कचरा न टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर कचरा टाकणे बंद होते; परंतु पुन्हा गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा कचऱ्यासाठी डंपिंंग ग्राऊंड म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे विर्डी-तळेखोल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्र्रशासनाची तारांबळ सुरू असल्याने बहुतांशी अधिकारी यामध्येच व्यस्त झाले आहेत; पण याचाच गैरफायदा घेत हा दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या प्रकारामुळे येथे नव्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.ग्रामस्थ ठेवणार पाळतगतवर्षी अशाच प्रकारे दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याच्या प्रकाराला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून संबंधित व्यावसायिकांना पुन्हा असे कृत्य न करण्यासाठी समज दिली होती.त्यानंतर हा प्रकार बंद झाला होता; पण पुन्हा येथे कचरा टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थ कचरा टाकणाऱ्यांवर आता पाळत ठेवणार असून रंगेहात पकडल्यानंतर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.