शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रत्नागिरीच्या वाट्याला ७९ कोटी ५३ लाख

By admin | Updated: June 7, 2015 00:51 IST

नुकसानभरपाई जाहीर : हेक्टरी २५ हजार; ३३ कोटी ८१ लाखांचा पहिला हप्ता

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाची नुकसानभरपाई म्हणून जाहीर झालेल्या रकमेतून ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. त्यापैकी ३३ कोटी ८१ लाख रुपये निधीचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये सतत दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ११ हजार ९६.४१ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले. थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे २०१२ मध्ये झालेल्या आंबा पिकाच्या नुकसानासाठी भरपाई देण्यात आली होती. उर्वरित ३० कोटींचा निधी परत गेला होता. वास्तविक यावर्षी अवकाळीचा फटका सातत्याने आंबा पिकाला बसला. पीक उत्पादन अत्यल्प असतानाही दर टिकणे अपेक्षित होते. आंब्याचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी गुंतवलेली रक्कमदेखील वसूल झाली नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमाफीची मागणी केली होती, परंतु या मागणीकडे डोळेझाक करीत अल्प नुकसानभरपाई जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)