शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

रत्नागिरीत पावसाने दाणादाण

By admin | Updated: August 3, 2016 01:00 IST

मंडणगडात उच्चांकी पाऊस : अनेक भागांत पाणी, दरडी कोसळण्याच्या घटना; घरे, गोठे यांची पडझड

 रत्नागिरी : सलग पाच दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे अनेक गावांमध्ये घरे-गोठे यांच्या पडझडीबरोबरच पुराचे पाणी भरणे, दरडी कोसळणे, आदी घटना घडल्या असून, त्यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत मंंडणगड तालुक्यात २१५ मिलिमीटर (सुमारे ८ इंच) इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पावसाने जिल्ह्यात जोरदार वृष्टी करण्यास सुरुवात केली आहे. संततधारेने कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत, तर अनेक घरे-गोठे यांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मंडणगड, खेड या तालुक्यांत पाणी भरण्याबरोबरच दरडी कोसळण्याचे प्रकार घडले असून, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर येथे पाणी भरले होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ मार्गावर दोन पुलांच्या मध्ये एस.टी. बस अडकली होती. त्यात २७ प्रवासी होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जवळजवळ १२ तासांहून अधिकवेळ हे प्रवासी बसमध्येच अडकून होते. याच तालुक्यात बहिरवली येथे दोन घरांचे अंशत: १८,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात आंजर्ला येथे तीन घरांचे अंशत: ६३,५५० रुपयांचे, कर्दे येथे एका घराचे अंशत: तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे दोन घरांचे अंशत: १७,९७० रुपयांचे, तळे येथे एका गोठ्याचे अंशत: ३०,४०० रुपयांचे, साखर येथे शाळेचे अंशत: १६,४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तुळशी बुद्रुक येथे देवाचा डोंगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. डोंगर खचत असल्यामुळे सद्य:स्थितीत दरड बाजूला करता येणार नसल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मोरवंड येथे नादुरुस्त घर पडल्याने १,१४,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण बाजारपेठ तसेच संगमेश्वर बाजारपेठ येथे १ आॅगस्ट रोजी सायंकाळी भरलेले पाणी आता ओसरले असून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे एका घराचे अंशत: २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळंबे येथे दरड कोसळली असून, तहसीलदार पाहणीसाठी गेले होते. याबाबतचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरूआहे. रत्नागिरी तालुक्यात शिवार-आंबेरे येथे अतिपावसामुळे तीन घरांचे व एका गोठ्याचे अंशत: नुकसान झाले असून, अहवाल तयार करणे सुरूआहे. राई-खापरेवाडी येथे एका घरावर झाड पडल्याने अंशत: २१,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील व्यक्तींना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील आय.टी.आय.चे पत्रे वाऱ्यामुळे उडाल्याने अंशत: नुकसान झाले आहे. आंबेडकरवाडी येथे पोलिस ठाण्याजवळ रस्त्यालगतची भिंंत कोसळली आहे. पोमेंडी येथे सुरेश काळ्या पवार यांच्या घराभोवती पाणी भरले होते. हरचेरी येथे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी भरलेले पाणी ओसरले असून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. राजापूर तालुक्यातील नाणार येथील विजयाकांत प्रभुदेसाई यांची म्हैस विद्युत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत झाल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत एकूण ११८८ मिलिमीटर, तर सरासरी १३२ मि.मी. पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यात सर्वांत कमी ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्ग खचला...! खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या भोगाव-हेलंगेवाडी येथील २०० फुटांचा रस्ता खचला आहे. याच रस्त्यानजीकची दरडही कोसळली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. ही दरड बाजूला करण्यासाठी महामार्ग अधिकारी व कामगार दाखल झाले आहेत. दरड बाजूला करण्याचे काम अविरत सुरू आहे. कशेडीपासून दोन कि.मी. अंतरावर पोलादपूर हद्दीत ही घटना घडली आहे. रस्ता खचल्याने वाहतूक एकेरी सुरू आहे. मात्र, पाऊस सुरूच असल्याने या कामात अडथळा येत आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूहोते. अडकलेल्या २७ प्रवाशांची सुटका मंडणगड तालुक्यात अडकून पडलेल्या ‘त्या’ २७ प्रवाशांची सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. जवळपासच्या गावांत राहणारे ११ प्रवासी पायी रवाना झाले, तर बसच्या मागील बाजूस असलेल्या कॉजवेवरील पाणी ओसरल्यानंतर ही बस मागे घेऊन पुन्हा मंडणगडमध्ये नेण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या मार्गाने त्यांना घरी पोहोचविण्यात आले. २४ तासांतील पाऊस (मि.मी) : मंडणगड २१५ दापोली १३८ खेड १६९ गुहागर ११३ चिपळूण १४० संगमेश्वर १२२ रत्नागिरी ११२ लांजा १३५ राजापूर ४४